शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

भाऊ नाही तर मी कशाला जगू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:17 AM

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि ...

घन:शाम कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कयड्राव : अपघातात गंभीर जखमी जखमी झालेला भाऊ जगण्याची शक्यता नसल्याने नैराश्य आलेल्या आकाशने ‘भाऊ जगत नाही तर मी कशाला जगू’, असे म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येसाठी तयार केलेल्या तयारीचे चित्रण व्हिडिओ कॉलद्वारे मित्रांना पाठवून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे आपली जीवनयात्रा संपविली आणि अपघातग्रस्त सूरजचाही मृत्यू झाला. नियतीच्या या धक्क्याने कदम कुटुंबाचे अस्तित्वच संपुष्टात आले. जिवाला चटका लावणाऱ्या लागोपाठ दोन भावांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.चिकोडी तालुक्यातून सात ते आठ वर्षांपूर्वी कदम कुटुंबीय कामासाठी इचलकरंजी परिसरात आले होते. दोन भाऊ, एक बहीण व वडील असा छोटा परिवार. बहिणीचे नांदणी येथील श्रवण जोगदंडे यांच्याशी विवाह झाला होता. दरम्यानच्या काळात कदम यांच्या वडिलांचे छत्र हरपल्याने ते पोरके झाले होते.नांदणी येथील त्यांच्या बहिणीचा संसार फुलत असतानाच तिचा दोन वर्षांपूर्वी बाळंतपणातच मृत्यू झाला होता. हा आघातही कदम बंधूंच्यावर होता. थोरला बंधू आकाश कदम हातकणंगले परिसरात काम करीत असल्याने तो खोतवाडी येथे भाड्याने राहत होता, तर सूरज कदम हा नांदणीमध्येच स्वतंत्र राहत होता.सूरज हा जयसिंगपूरला मोटारसायकलीवरून येत असताना दोन दिवसांपूर्वी अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु त्याची अवस्था पाहून तो वाचू शकणार नाही, असा समज मोठा भाऊ आकाशला झाल्याने तो नाराज झाला. वडील गेले, बहीण गेली, भाऊही गेला तर मी राहून काय करू, असे मित्रांना म्हणाला आणि खोतवाडी येथील आपल्या खोलीत गेला. तेथे आकाश गेल्यावर त्याने आत्महत्या करण्यासाठी केलेली तयारी व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या मित्रांना दाखविली. मित्रांनी आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला; परंतु नियतीच्या मनात वेगळेच असल्याने तिथे मित्र पोहोचूपर्यंत त्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली होती. दुसºया दिवशी अपघातग्रस्त असलेला भाऊ सूरज याचाही मृत्यू झाला. वडिलांचे निधन, बहिणीचा मृत्यू व दोन भावांचाही झालेला घात यामुळे कदम कुटुंबच संपून गेले.