शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

कोल्हापूरकरांचा 'पाहुणचार', बसस्थानकांत अडकलेल्या 150 चालक-वाहकांची भूक भागवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 10:26 IST

पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी.ची सर्व वाहतूक बंद करण्यात आली.

ठळक मुद्देपावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी.ची सर्व वाहतूक बंद करण्यात आली. कोल्हापूर आगारांच्यावतीने परगावच्या सर्व चालक वाहकांसाठी राहण्याची सोय तसेच जेवणासह चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे.

प्रदीप शिंदे 

कोल्हापूर : सोमवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. संध्याकाळी पावसानं चांगलाच जोर धरला होता. कोल्हापूरातून आता निघण्याच्या तयारीत असताना आजूबाजूच्या प्रवाशांची कुजबूज कानावर आली. पावसामुळे महामार्ग बंद झालेत आणि काळाजत धस्स झाले. या परक्या शहरात रहायचे कसे खायचे काय? असा प्रश्न परजिल्हयातील चालक वाहकांना पडला असताना, कोल्हापूर आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्था आमच्यासाठी देवदूतासारखे धावून आल्याची भावना मध्यवर्ती बसस्थानकांत अडकलेल्या दिडशे चालक वाहकांनी व्यक्त केली.

पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागाच्यावतीने एस.टी.ची सर्व वाहतूक बंद करण्यात आली. कर्नाटक राज्यातील बेळगाव, विजापूर डेपोसह कोकण, सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली,सातारा येथील सुमारे 150 चालक वाहक मध्यवर्ती बसस्थानकांत गेली पाच दिवसापासून अडकून पडले. नियमानुसार या चालक वाहकांना गाडी सोडून जाता येत नसल्याने त्यांना तिथेच थांबून होते.विजापूर गाडीचे वाहक समीर टांगेवाले म्हणाले , सोमवारी गाडीत बसलो पावसांची रिपरिप सुरू होती. बाहेरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडलो. पावसामुळे वाहतूक बंद होती आम्ही खाली उतरलो आणि आढावा घेत होतो. घड्याळाचे काटे पुढे पुढे सरकू लागले, तशी आमची चलबिचल वाढली. पाहता पाहता घड्याळाचा काटा रात्रीचा एकचा आकडा ओलांडून गेलादेखील. जवळपास जाणाऱ्या प्रवाशांनी आपापली सोय पाहून काढता पाय घेतला. एस.टी.मध्ये मोजकेच राहिलो होतो. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर काळजी दिसू लागली. पावसानंही जोर धरला. वातावरण आता भेसूर होऊ लागलं होतं. एव्हाना अन्य गाडीतील वाहक-चालक आले होते. ती रात्र तिथंच काढावी लागेल, अशी चिन्ह दिसत होती. आता आमच्या पोटात गोळा आला होता. आम्ही गाडीत बसून कशीतरी रात्र काढली. सकाळ झाली तरी पावसाने उघडीप दिली नव्हती. पाऊस काही कमी होत नव्हता. दुपारीपर्यंत बसस्थानकांत बसून होतो. एकच गोंधळ उडाला. तिकडे जाऊन पाहतो, तर कोल्हापूरातील आगार व्यवस्थापक अजय पाटील आणि त्यांचे कर्मचारी चक्क जेवण घेऊन आले होते. हे पाहून डोळ्यात पाणी आले. कोल्हापूरातील लोकांची माणुसकी पाहून मनाला समाधान वाटले, असे वाहक-चालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कोल्हापूर आगारांच्यावतीने परगावच्या सर्व चालक वाहकांसाठी राहण्याची सोय तसेच जेवणासह चहा नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. कोल्हापुरातील अनेक तरूणांनी, मंडळांनी स्वयंसेवी संस्थांनी उत्स्फूर्तपणे मदतीचा हात दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या विविध भागात हे मदतकार्य सुरू आहे, अशी मदत कुठे मिळत नाही अशी बोलकी प्रतिक्रिया येथील चालक वाहकांच्यावतीने व्यक्ती करण्यात आली. पूरामुळे सर्व मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे कोल्हापूर आगारात सुमारे 150 चालक वाहक अडकलेत. कोल्हापूर आगार व सामाजिक संस्थेच्यावतीने या सर्वाची राहण्याची, नाष्टांच्याची व जेवणाची सोय केली आहे.दयानंद पाटील, ज्युनिअर  आगार व्यवस्थापक 

गेले सहा दिवस आम्ही याठिकाणी पावसामुळे थांबलो आहे. मात्र याठिकाणी आम्हाला कोणतीही अडचण जाणवली नाही. दोन वेळ जेवण, नाष्टा आणि चहा तसेच राहण्याची सोय केली. कोल्हापूरकरांचा अनोखा पाहुणचार पाहून आम्ही भारावलो आहे.शशिकांत बनसोडे, चालक मालवण डेपो 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरBus Driverबसचालक