शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
2
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
3
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
4
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
5
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
6
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार
7
मर्मबंध! आईच्या दुधाचा स्वाद, ब्रेस्ट मिल्क फ्लेव्हर्ड आईस्क्रीमची तुफान चर्चा, पण हे आहे तरी काय?
8
हृदयद्रावक! रक्षाबंधनासाठी येणाऱ्या भावासोबत आक्रित घडलं, वाट पाहत होत्या बहिणी पण...
9
लफडं! पतीचे हात तोडले अन् १० वर्ष लहान भाच्यासोबत पळाली मामी; नात्याला काळीमा फासणारी कहाणी
10
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
11
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
12
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
13
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
14
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
15
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
16
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
17
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
18
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
19
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
20
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.

महामार्ग सहापदरीकरणाची लगीनघाई

By admin | Updated: June 29, 2015 00:26 IST

प्रशासन हतबल : भूसंपादनाअगोदरच प्राधिकरणाने काम घेतले हाती

दत्ता यादव - सातारा  -विकासप्रक्रिया कधीही थांबू शकत नाही, हे तत्व असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहापदरीकरणाचे काम हाती घेतले; परंतु रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी अद्याप काही जमिनी संपादन होऊन शासनाच्या ताब्यात मिळालेल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे हे सहापदरीकरणाचे काम मे २०१६ पर्यंत लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारी आणि सुनावणीमध्ये प्रशासनाचा वेळ जात असल्याने सहापदरीकरणाचे काम कासवगतीने सुरू आहे.पूर्वीचा हायवेचा जो प्लॅन होता, त्यावेळी फारसे उड्डाणपूल नव्हते. सहापदरीकरण सुरू झाल्यानंतर शासनाच्या लक्षात आलं की, जिथं-जिथं गावाचा नाका, अ‍ॅप्रोच आहे, त्या ठिकाणी आता पूल बांधणे गरजेचे आहे. वास्तविक दुपदरी किंवा चारपदरीचे काम सुरू करताना त्याचवेळी पूल उभारणे गरजेचे होते. मात्र महामार्ग प्राधिकरणाने यामध्ये रस दाखविला नाही. सध्या सहापदरीकरणाचे काम हाती घेतले असले तरी अनेक ठिकाणच्या जमिनीचे अद्याप संपादन झालेले नाही. त्यामुळे प्रशासन अक्षरश: मेटाकुटीला आले आहे. लोकांचा विरोध होत असल्यामुळे शासनाची भूमिका महत्त्वाची असते. या ठिकाणी पूल होणे गरजेचे आहे. या ठिकाणी अपघात होतात. त्याची कारणे लोकांना सांगितली जातात. हायवेचे मेजर ट्राफिक उड्डाणपुलावरून जाते. बाकीची रहदारी पुलाच्या खालून असते. दुचाकी, पादचाऱ्यांना उड्डाणपुलाच्या खालचा रस्ता महत्त्वाचा दुवा असतो. लोकांना हे सर्व समजावून सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाही तर शेवटी कायद्याचा वापर करून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. परंतु नागरिकांच्या कलेने आणि कायदा व सुवस्था अबाधित राखून प्रशासनाला भूसंपादन करावे लागणार आहे. उड्डाणपूल बांधताना प्रशासनापुढे अनेक अडचणी येत आहेत. भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोधभूसंपादनाची प्रक्रिया कायदेशीर केल्याशिवाय हायवेचे काम सुरूच करता येत नाही. भूसंपादनामध्येच प्रशासनाचा जास्त वेळ जात आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना तीन नोटिसा देण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप काही शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाला जमिनी ताब्यात दिल्या नाहीत. पूर्वी भूसंपादन झाले होते, त्यावेळी आमची जमीन गेली आहे, आत्ता पण आमचीच जमीन घेताय. आता आम्ही जगणार कसं? असा सवाल लोकांकडून केला जात आहे. यामध्ये शासनाचा आणि ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांचाही दोष नाही. शेतकऱ्यांची जमीन आतल्या बाजूला असती तर आम्ही तुमच्याकडे कशाला आलो असतो, असे प्रशासनाचे म्हणणे आहे, तर विकास करायचा आहे त्यामुळे भूसंपादन करावेच लागणार, अशी सक्तीची भूमिका प्रशासनाला अखेर घ्यावी लागणार आहे.