शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

कोल्हापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले; शिवारात, झोपडीत पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 11:45 AM

जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती.

कोल्हापूर : जिल्ह्यात काल बुधवार पासून अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरुच होती. तर आज, गुरुवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. यामुळे नागरिकांची ताराबंळ उडाली. या अवकाळी पावसामुळे मात्र शेतकरी चिंतेत आहे. शिवारातील कामे खोळंबली आहेत. ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे भाजीपाल्यासह रबीलाही तडाका बसणार आहे.अवकाळी पावसाच्या या तडाख्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. रस्ते जलमय झाले आहेत तर शिवारात पाणीच पाणी झाले आहे. यातच साखर कारखान्याचा हंगाम सुरु सुरु असल्याने ऊस तोड मजूर कारखानास्थळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या झोपडीत पाणीच पाणी झाल्याने त्यांचे हाल झाले. अनेक मजूरांनी रात्र जागून काढली.  सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या तर दहानंतर पुन्हा ऊन पडले होते. यामुळे वातावरणात ऊन-पावसाचा खेळ सुरु असल्याचे चित्र होते. वातावरणातील या बदलाचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे आजारपणात वाढ झाल्याचे चित्र आहे. एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे या अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गेली तीन-चार दिवस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मराठवाडा आणि कोकण भागासह अनेक ठिकाणी 3 डिसेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत आता हवामान खात्याने 'जेवाद' चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हे वादळ 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस