शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झाले; पण भरपाई कधी; अतिवृष्टी, महापुराने कोल्हापूर जिल्ह्यात १० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

By राजाराम लोंढे | Updated: September 20, 2025 16:00 IST

कृषी विभागाकडून १७.७३ कोटींची मागणी

राजाराम लोंढेकोल्हापूर : यंदा वार्षिक सरासरीपेक्षा अजून पाऊस कमी असला, तरी शेतकऱ्यांचे नुकसान अधिक झाले आहे. मे महिन्यात मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले, तर ऑगस्टमध्ये अतिव, पूराने कंबरडे मोडले. दोन्ही वेळेला ४६ हजार ८४३ शेतकऱ्यांचे १० हजार ७०४ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १७.७३ कोटीचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे केले पण, भरपाई कधी मिळणार? मे मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेली नाही.साधारणता कोल्हापूर जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट महिन्यात तुलनेत अधिक पाऊस होऊन अतिवृष्टी, महापुराने शेतकऱ्यांचे नुकसान होते. पण, यंदा मान्सूनपूर्व पावसानेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. उन्हाळी पिकांना फटका बसून भुईमूग, भाजीपाला, सुर्यफुल, उन्हाळी भात या पिकांचे नुकसान झाले. मे महिन्यातील पावसाने जिल्ह्यातील १० हजार २८४ शेतकऱ्यांचे ३ कोटी ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे, पण अद्याप एक दमडीही शेतकऱ्यांना मिळालेली नाही.पहिली नुकसानभरपाई मिळायची आहे, तोपर्यंत ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांचे ८८३५ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये १४ काेटी २८ लाखांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांनी यांनी एकत्रीतरित्या केले आणि त्याचा अहवालही शासनाला सादर केला आहे.

मे व ऑगस्ट महिन्यात असे झाले तालुकानिहाय नुकसान हेक्टर, कंसात रक्कम लाखाततालुका - मे (हेक्टर) (रक्कम) - ऑगस्ट (हेक्टर) (रक्कम) 

  • करवीर - ३०५.३७ (६६.११) - ९९८.४० (१६०.८३) 
  • कागल - २२.७३ (४.२५) - १०८६.८३ (१७०.४६) 
  • राधानगरी - १२३.८७ (२३.९१) - १४६६.०१ (२८५.४९) 
  • गगनबावडा - ३९.९५ (११.७२) - ४९०.४० (८२.३१) 
  • पन्हाळा - ३५८.२६ (६१.७१) -  
  • शाहूवाडी - १५४.१६ (२८.५७) - ३७९.५० (६३.०४) 
  • हातकणंगले - १९५.३५ (३३.२०) - ७१४.३० (७८.५७) 
  • शिरोळ - ५०५.२७ (८६.०२) - ३१२०.०० (४८६.४५) 
  • गडहिंग्लज - ५.८० (१.०३)  - 
  • आजरा - ५.५८ (१.३०) - १०४.५० (१७.५४) 
  • चंदगड - ६४.८६ (११.०५) - ०.३२ (०.०२७२०) 
  • भुदरगड - ८७.२५ (१५.२९) - ४७४.८९ (८३.७७) 

जिल्ह्यात नुकसान झालेल्या पिकांंचे संयुक्त पंचनामे झालेले आहेत. नुकसानीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. - नामदेव परीट (उपसंचाक, कृषी विभाग)