शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

Kolhapur: वळीव पावसाच्या तडाख्यात केळी बागा भुईसपाट, शाळू कोलमडला; पंचनाम्यांचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:02 IST

ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेल्या नुकसानीने शेतकरी हबकून गेला

आयुब मुल्लाखोची : मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वळीव पावसाच्या तडाख्यात हातकणंगले तालुक्यातील निम्म्या गावातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळू, मका, हरभरा, गहू भुईसपाट तर केळी अर्ध्यातूनच तुटून पडली आहे. भाजीपाला उन्मळून पडून जमीनदोस्त झाला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना वेदना देणारे ठरले आहे. अंतिम टप्प्यातील नुकसानीने शेतकरी हबकून गेला आहे.सोमवारी पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस सव्वातासाने थांबला. सुसाट वारे, झपाझप पडणारा धो-धो पाऊस यामुळे उभी पिके आडवी झाली. तर केळी तुटून पडली. भाजीपाला उखडून जागीच पडला. रात्री पिकांचे नुकसान झाले असेल, असा अंदाज आला होता. परंतु सकाळी शेतात पिकांची स्थिती पाहावयास गेलेला शेतकरी पिके किसलेली पाहून हतबल झाला. शासन नुकसानभरपाई देईल काय, या अपेक्षेने शेतकरी चौकशी करू लागला आहे.पेठ वडगाव सर्कलमध्ये नुकसानीचा फटका सर्वात जास्त आहे. जनावरांच्या शेडचे पत्रे हवेत उडून ते दुसरीकडे जाऊन पडले आहेत. कुंभोज, वाठार, हातकणंगले परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बुवाचे वाठार येथील केळीच्या बागेचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, भादोले परिसरात शाळू, मका, गहू पिकांचे साठ टक्के नुकसान झाले आहे. आडसाली ऊस जमिनीबरोबर झोपला आहे.काढणीच्या काळातच पाऊसरब्बी हंगामातील निम्म्याहून अधिक पिकांची काढणी झाली असून, उर्वरित पिकांची काढणी सुरू होणार होती. त्यामुळे नुकसान जास्त झाले आहे. शाळू ५००, गहू १००, हरभरा १००, मका १५ हेक्टर तर १०० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपये नुकसान केळी पिकाचे झाले आहे. जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंचनामे करण्याचे काम सुरूकुंभोज ते नीलेवडी असा पूर्व पश्चिम विभागात वळीव तुफान बरसला आहे. भादोले परिसरात गारांचाही वर्षाव झाल्याने उसाचा पाला फाटला आहे. शेतात विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. झाडेही पिकात पडल्याने नुकसान झाले आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने यांनी प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

शाळू, गहू पिके काढताना कस होणार आहे. शाळू काळा पडणार असून कापणी मशीन नेताना अडचण होणार आहे. ऐन वाळण्याच्या स्थितीत असताना शाळू, गहू, हरभरा यास ओलावा लागला आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण जास्त राहणार आहे. भाजीपाला तर उत्पादनाच्या अगोदरच नुकसानीचा ठरला आहे. - श्रीकांत पाटील, लाटवडे

किणीत प्राथमिक शाळेचे छप्पर उडालेकिणी : वादळी वाऱ्यामुळे किणी (ता. हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्र्याचे छत व घरे, जनावरांचे शेड अशा १४ ठिकाणचे पत्रे व छत उडून गेल्याने सुमारे ३५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शाळेच्या ग्राऊंडवर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्राॅल्या पलटी झाल्या. ठिकठिकाणी विजेचे खांब मोडून तारा तुटल्या आहेत. माळवाडीवरील हैदर महाबरी यांच्या सहा खोल्यांवरील सिमेंट पत्र्याचे छत उडून गेले आहे. किणी तळसंदे रोडच्या कडेला असणारी हेमंत पाटील यांची एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्याने चार ते पाच लाख रूपये नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी