शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: वळीव पावसाच्या तडाख्यात केळी बागा भुईसपाट, शाळू कोलमडला; पंचनाम्यांचे काम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:02 IST

ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेल्या नुकसानीने शेतकरी हबकून गेला

आयुब मुल्लाखोची : मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार वळीव पावसाच्या तडाख्यात हातकणंगले तालुक्यातील निम्म्या गावातील शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळू, मका, हरभरा, गहू भुईसपाट तर केळी अर्ध्यातूनच तुटून पडली आहे. भाजीपाला उन्मळून पडून जमीनदोस्त झाला आहे. ऐन काढणीच्या तोंडावर पिकांचे झालेले नुकसान शेतकऱ्यांना वेदना देणारे ठरले आहे. अंतिम टप्प्यातील नुकसानीने शेतकरी हबकून गेला आहे.सोमवारी पावसाने हुलकावणी दिली. मंगळवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेला पाऊस सव्वातासाने थांबला. सुसाट वारे, झपाझप पडणारा धो-धो पाऊस यामुळे उभी पिके आडवी झाली. तर केळी तुटून पडली. भाजीपाला उखडून जागीच पडला. रात्री पिकांचे नुकसान झाले असेल, असा अंदाज आला होता. परंतु सकाळी शेतात पिकांची स्थिती पाहावयास गेलेला शेतकरी पिके किसलेली पाहून हतबल झाला. शासन नुकसानभरपाई देईल काय, या अपेक्षेने शेतकरी चौकशी करू लागला आहे.पेठ वडगाव सर्कलमध्ये नुकसानीचा फटका सर्वात जास्त आहे. जनावरांच्या शेडचे पत्रे हवेत उडून ते दुसरीकडे जाऊन पडले आहेत. कुंभोज, वाठार, हातकणंगले परिसरातील पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. बुवाचे वाठार येथील केळीच्या बागेचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. खोची, भेंडवडे, लाटवडे, भादोले परिसरात शाळू, मका, गहू पिकांचे साठ टक्के नुकसान झाले आहे. आडसाली ऊस जमिनीबरोबर झोपला आहे.काढणीच्या काळातच पाऊसरब्बी हंगामातील निम्म्याहून अधिक पिकांची काढणी झाली असून, उर्वरित पिकांची काढणी सुरू होणार होती. त्यामुळे नुकसान जास्त झाले आहे. शाळू ५००, गहू १००, हरभरा १००, मका १५ हेक्टर तर १०० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. एकरी दोन ते सव्वादोन लाख रुपये नुकसान केळी पिकाचे झाले आहे. जवळपास ८०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंचनामे करण्याचे काम सुरूकुंभोज ते नीलेवडी असा पूर्व पश्चिम विभागात वळीव तुफान बरसला आहे. भादोले परिसरात गारांचाही वर्षाव झाल्याने उसाचा पाला फाटला आहे. शेतात विद्युत तारा तुटून पडल्या आहेत. झाडेही पिकात पडल्याने नुकसान झाले आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने यांनी प्रशासनाला तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे.

शाळू, गहू पिके काढताना कस होणार आहे. शाळू काळा पडणार असून कापणी मशीन नेताना अडचण होणार आहे. ऐन वाळण्याच्या स्थितीत असताना शाळू, गहू, हरभरा यास ओलावा लागला आहे. त्यामुळे नुकसानीचे प्रमाण जास्त राहणार आहे. भाजीपाला तर उत्पादनाच्या अगोदरच नुकसानीचा ठरला आहे. - श्रीकांत पाटील, लाटवडे

किणीत प्राथमिक शाळेचे छप्पर उडालेकिणी : वादळी वाऱ्यामुळे किणी (ता. हातकणंगले) येथील जिल्हा परिषदेच्या प्रताप विद्यामंदिर शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्र्याचे छत व घरे, जनावरांचे शेड अशा १४ ठिकाणचे पत्रे व छत उडून गेल्याने सुमारे ३५ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तर शाळेच्या ग्राऊंडवर लावलेल्या उसाच्या रिकाम्या ट्राॅल्या पलटी झाल्या. ठिकठिकाणी विजेचे खांब मोडून तारा तुटल्या आहेत. माळवाडीवरील हैदर महाबरी यांच्या सहा खोल्यांवरील सिमेंट पत्र्याचे छत उडून गेले आहे. किणी तळसंदे रोडच्या कडेला असणारी हेमंत पाटील यांची एक एकरातील केळीची बाग भुईसपाट झाल्याने चार ते पाच लाख रूपये नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी