शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 6:08 PM

कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरात गडगडाटासह तासभर जोरदार पाऊसपिकांची तहान भागणार: लोकांची उडाली तारांबळ

कोल्हापूर : कोल्हापूर शहर व जिल्ह्याच्याही अनेक भागांत गुरुवारी दुपारी सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. काही भागांना पावसाने झोडपून काढले. गेले वीस दिवस खडा मारल्यासारखा बंद झालेल्या पावसामुळे माळरानातील पिके माना टाकू लागली होती. भात, भुईमुगासह सर्वच पिकांना पोषक असा पाऊस झाला. हा पावसाळी हंगामातीलच पाऊस असून, तो परतीचा पाऊस नसल्याचे जाणकारांनी सांगितले.गेले दोन दिवस रात्री व पहाटेही गार वारे वाहत होते. थंडीही सुुरू झाली होती. त्यामुळे पावसाळा संपून हिवाळा सुरू झाला की काय, अशी भीती व्यक्त होत होती. दुपारी तीनच्या सुमारास आभाळ दाटून आले. ढगांचा गडगडाटही वळिवासारखा होता. बघता-बघता जोरदार पाऊस सुरू झाला. तापलेला मातीचा गंध आसमंतात भरून गेला. तासभर हा पाऊस सुरू राहिला तरी रिपरिप मात्र बंद झाली नव्हती.एवढ्या लवकर पाऊस जाणे परवडणारे नव्हते; कारण पिकांना अजूनही पावसाची गरज आहे. यंदाच्या हंगामात जूनमध्ये सुरू झालेला पाऊस मध्ये थांबलाच नाही. तब्बल ५० दिवस तो एकसारखा पडत होता. त्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त होऊन गेले होते. पिकांची वाढही थांबली होती. ‘नको आता पाऊस’ असे म्हणण्याची वेळ आली होती. हा पाऊस आॅगस्टच्या अखेरीस थांबला. तो असा थांबला की आॅक्टोबरसारखा उन्हाचा तडाखा सुरू झाला.

सुरुवातीला पंधरा दिवस पिकांनाही ते पोषक होते; परंतु जसजशी उघडीप वाढली तशी पिके अडचणीत येऊ लागली होती. आता जिल्ह्यात भात पोटरी भरण्याची स्थिती आहे. सुरुवातीला धूळवाफ पेरणी झालेले भात बाहेर पडले आहे. भुईमूगही शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनची काढणी मात्र अनेक ठिकाणी सुरू झाली आहे. ऊस वाळू लागला नसला तरी त्यालाही पाण्याची गरज होती. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडविली तरी सर्व प्रश्न निसर्गाने एका तासात सोडविले. 

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Rainपाऊसkolhapurकोल्हापूर