शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पंचगंगेची पातळी ३३ फुटांच्यावर; ७२ बंधारे पाण्याखाली 

By राजाराम लोंढे | Updated: July 19, 2024 16:51 IST

जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, जिल्हा प्रशासनाचा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस सुरु असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दुपारी चार वाजेपर्यंत पंचगंगा ३३ फुटावरुन वाहत असल्याने जिल्ह्यातील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्या जनजीवन काहीसे विस्कळीत गेले आहे.जिल्ह्यातील चार धरणे पुर्ण क्षमतेने भरली असून प्रमुख ‘राधानगरी’ ६८, ‘वारणा’ ६६ तर दूधगंगा ५२ टक्के भरले आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला असून जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.गुरुवार पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर जोरदार पाऊस कोसळत राहिला, शुक्रवारी सकाळ पासून त्यात वाढ होत गेली असून दिवसभर एक सारखा पाऊस कोसळत असल्याने नदी, ओढ्यांचे पाणी झपाट्याने वाढत आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड व शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे.धरणक्षेत्रातही पाऊस कोसळत असल्याने राधानगरीतून प्रतिसेंकद १४००, वारणातून १५४६,. कासारीतून ५५०, कुंभीतून ३००, घटप्रभातून ६९५२ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने पुराचे पाणी झपाट्याने वाढ आहे. पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात तब्बल चार फुटाने वाढली असून दुपारी चार वाजता ३३ फुटाच्या वरुन पाणी वाहत आहे. पंचगंगा इशारा पातळीकडे (३९ फुट) आगेकुच करु लागली आहे.  विविध नद्यांवरील तब्बल ७२ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील जनजीवन विस्कळीत झाले आहे.हवामान विभागाने कोल्हापूरसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नदीच्या गावांना सावधनतेचा इशारा दिला आहे.

२२ खासगी मालमत्तांची पडझडजिल्ह्यात २२ खासगी मालमत्तांची पडझड झाली असून १३ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहीती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीWaterपाणीTrafficवाहतूक कोंडी