शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

धरण परिसरात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:56 IST

१३ तालुक्यांत सरासरीच्या ६८३.६ मि. मी. पाऊस; धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला

पुणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या आठवड्यापासून जोरदार कमबॅक केले असून खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, मुळशी व मावळ या तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांत आतापर्यंत सरासरीच्या ६८३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने भाटघर, चासकमान, आसखेड, डिंभे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गात सोमवारी वाढ केली आहे. मात्र, जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त इंदापूर, दौैंड व शिरूर या तालुक्यांत पावसाने तुरळक हजेरी लावली. यामुळे येथील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.जिल्ह्यात दर वर्षी सरासरी ८४५ मिलिमीटर पाऊस पडतो. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार या वर्षी पावसाने दमदार आगमन केले. पहिल्या इनिंगमध्येच पावसाने जूनची सरासरी ओलांडली. विशेष म्हणजे, नेहमी अवर्षणग्रस्त असलेल्या तालुक्यांत सुरुवातीलाच आगमन केल्याने या वर्षी तेथील परिस्थिती बदलेल, अशी आशा होती; मात्र नंतर पावसाने ओढ दिली.जून, जुलै, आॅगस्ट या महिन्यांत सरासरी ४५० मिलिमीटर इतका पाऊस होतो. आतापर्यंत ६८३.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जून ते आॅक्टोबर महिन्यात ८२३.६ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस होतो. आतापर्यंत या सरासरीच्या १३५ टक्के पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक मावळ तालुक्यात १,९३१.३ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत १५८ इतका आहे. तर, त्याखालोखाल मुळशी तालुक्यात १,८३१.४६२ मिलिमीटर म्हणजे सरासरीच्या ११५ टक्के पाऊस झाला आहे. भोर १२३.१ टक्के, जुन्नर ९७.८ टक्के, खेड ७६.१ तर पुरंदर ५०.३ टक्के पाऊस झाला आहे.भामा-आसखेडमधून ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्गआसखेड : थोडाकाळ पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा मुसळधार पडल्याने भामा आसखेड धरणातील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे; तसेच या धरणांमधून भामा नदीत ३ हजार २८० क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असल्याची माहिती धरण प्रशासनाचे भारत बेंद्रे यांनी दिली. पावसाचा जोर वाढल्याने प्रवाह सकाळी ५५३ क्युसेक्सवरून १६५३ क्युसेक्स करण्यात आला, तर संततधार पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने प्रवाह वाढविण्यात आला आहे. त्यानंतर धरणात येणाºया प्रवाहाचा विचार करून विसर्ग जास्त करण्यात येईल. तरी नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन भारत बेंद्रे यांनी केले आहे.दौंड, बारामती, शिरूर या तालुक्यांना दमदार पावसाची आशाजिल्ह्यातील नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बारामती, इंदापूर, दौैंड व शिरूरमध्ये पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. बारामतीत ३४.४ टक्के पाऊस झाला आहे. इंदापूरला ४०, दौैंडला २६ तर शिरूरला २७.३ टक्के पाऊस झाला. त्यामुळे येथे दुष्काळसदृृश परिस्थिती निर्माण होत आहे. विहिरींचा पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांना चार व पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी