शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:06 IST

पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने काल, सोमवार सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात धुवाँधार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंचगंगेची पाणीपातळी २५ फूट २" इंच इतकी असून एकुण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे.काल, सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. शिरोळ वगळता सगळीकडे पाऊस चांगला झाला, त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेंकद १ हजार घनफूट विसर्ग सुरू आहे.शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीचा इशाराभारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात शुक्रवार (दि. ८) पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतलेशाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी गेलेले 70- 80 पर्यटक कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने काल, सोमवारी सायंकाळी अडकले होते. ते सर्व प्रवासी रात्री उशिराच सुरक्षितपणे माघारी परतले. अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी