शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:06 IST

पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने काल, सोमवार सकाळपासून दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी, भुदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात धुवाँधार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, पंचगंगेची पाणीपातळी २५ फूट २" इंच इतकी असून एकुण १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. हवामान विभागाने पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टी होईल असा इशारा दिला आहे.काल, सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत गेला. दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. शिरोळ वगळता सगळीकडे पाऊस चांगला झाला, त्यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी प्रतिसेंकद १ हजार घनफूट विसर्ग सुरू आहे.शुक्रवारपर्यंत अतिवृष्टीचा इशाराभारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात शुक्रवार (दि. ८) पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतलेशाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी गेलेले 70- 80 पर्यटक कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने काल, सोमवारी सायंकाळी अडकले होते. ते सर्व प्रवासी रात्री उशिराच सुरक्षितपणे माघारी परतले. अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी