शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:12 PM

कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !अटल विमा कल्याण योजनेतून मदत : ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे.कोरोनाच्या साथीच्या संकटामुळे नोकरी गेल्याने बेरोजगार झालेल्यांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्म्या रकमेची मदत अटल विमा कल्याण योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर विभागातील कितीजणांना मदत होईल, याबाबतचा आढावा लोकमतने  घेतला.

कोरोनापूर्वी फेब्रुवारीमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण ३,२८,८४१ कामगारांची भविष्यनिर्वाह निधीची वर्गणी भरण्यात आली होती.

ऑगस्टमध्ये ही संख्या ३,०१,४१९ पर्यंत आली आहे. त्यामुळे या विभागातून २७,४२२ जण बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. त्यांतील जे कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असतील, त्यांना अटल विमा कल्याण योजनेतून मदत मिळणार आहे.अशी मिळावा पात्र-अपात्रतेची माहितीबेरोजगार झालेल्या कामगारांना या अटल विमा कल्याण योजनेतील मदत मिळविण्यासाठी ते पात्र आहेत की, अपात्र हे ईएसआयसी आयपी पोर्टलच्या माध्यमातून जाणून घेता येईल. या पोर्टलवर कामगारांनी त्यांचा १० अंकी विमा क्रमांक नोंदविल्यानंतर त्यांना ही माहिती मिळेल. दर महिन्यात त्यांच्याकडून आणि कंपनीकडून किती रक्कम वर्गणीपोटी ईएसआयसीकडे जमा झाली हेही जाणून घेता येईल.

या योजनेतून मदत मिळविण्यासाठी संबंधित कामगार हे ईएसआयसीचे सदस्य असणे आवश्यक आहे. योजनेची माहिती ईएसआयसी आयपी पोर्टलवर उपलब्ध आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार योजनेबाबतची पुढील कार्यवाही जिल्हा पातळीवर करण्यात येईल.- सूरज रेवणकर, शाखा प्रबंधक, ईएसआयसी, कोल्हापूर

असंघटित क्षेत्रात काम करणारे, ईएसआयसी लागू नसणारे, कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेकजण कोरोनामुळे बेरोजगार झाले आहेत. स्वयंरोजगार करणाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय केंद्र सरकारने लवकर घ्यावा, या मागणीसाठी लवकरच कामगार संघटना संयुक्त कृती समितीद्वारे निदर्शने केली जाणार आहेत.- अतुल दिघे, निमंत्रक, कामगार संघटना संयुक्त कृती समिती

आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • ईएसआयसीकडे नोंदणी असणारे कोल्हापुरातील कामगार : १०७३८१
  • भविष्यनिर्वाह निधीत सध्या समावेश असलेले कोल्हापूर विभागातील कामगार : ३०१४१९
  •  या निधीतून कमी झालेले कामगार : २७४२२

 

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारjobनोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर