शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जीएसटी, कर्जमाफीवरून राजकीय खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:47 IST

भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्याने सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण तापले. ​​​​​​​

ठळक मुद्देआवाज वाढल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातील वातावरण तापलेगटनेते अरुण इंगवले आक्रमकराजकारणातूनच दोन तालुके वगळले का?

कोल्हापूर : भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्याने सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण तापले.सभा सुरू होऊन अर्धा तास झाल्यानंतर भगवान पाटील यांनी अंगात बॅनर घालून त्यावर पाठीमागे जिल्हा परिषदेची रिकामी तिजोरी दाखविली होती; तर पुढच्या बाजूला मजकूर लिहिला होता, निवडणुकीवेळी भाजपने अनेक आश्वासने दिली. मात्र आता निधीमध्ये ३० टक्क्यांची कपात केली आहे. कर्जमाफीमध्येही शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. कृषी अवजारांवर जीएसटी लावला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच ‘कितना बदल गया इन्सान’ असे म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.यावर लगेचच पक्षप्रतोद विजय भोजे सरकारच्या समर्थनार्थ उठले. दोन्ही कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने संपूर्ण देशासाठी ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र केवळ महाराष्ट्रात ३२ हजार कोटींची कर्जमाफी झाली. तुमचा गैरसमज झालाय. ५० वर्षांत जे तुमच्या सरकारला जमले नाही ते या सरकारने केले. शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी शून्य टक्के दराने पैसे दिलेत. निधी मिळणार आणि पुढच्या बैठकीला तुम्हांला हे अंगातील पोस्टर बदलावे लागणार, असे पाटील यांना ठणकावून सांगितले.गटनेते अरुण इंगवले यांनीही आक्रमक भाषेत पाटील यांना विरोध केला. पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही राजकीय रंग आणला आहे. मोदींचं सरकार आल्यापासून अनेकांच्या पोटात गोळा आलाय. मीही राष्ट्रवादीत होतोे. राज्य कर्जात बुडालं असताना शेतकऱ्यांसाठी म्हणून कर्जमाफी दिली.

याआधीच्या कर्जमाफीवेळी एक एकर शेती असणाऱ्याला दीड कोटी रुपये दिले गेले. करवीर तालुक्यात भ्रष्टाचार करून कर्जमाफी घेतली; म्हणून सदाशिराव मंडलिक यांनी त्याला विरोध केला. नागपूर अधिवेशनानंतर कात्री लावलेला निधीही परत मिळणार आहे. हा केवळ राजकीय विरोध आहे.

इंगवले बोलत असताना कॉँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांनी त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला. ‘तुम्ही त्या कारभारात सहभागी होता ना?’ अशी विचारणा त्यांनी केली. ‘हे बोलणं बरोबर नाही’ असे त्यांनी निक्षून सांगितले. तेव्हा इंगवले यांनीही ‘त्यांना पक्ष सोडला म्हणूनच बोलतोय’ असे सांगितले.

प्रसाद खोबरे म्हणाले, राजू शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा दिला म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो आणि आता जर शेट्टी भाजपला शिव्या देत असतील तर त्याला इलाज नाही. या खडाजंगीमुळे सभागृहातील वातावरण तापले. अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी या विषयावर पडदा पाडत पुढचा विषय सुरू केला.

राजकारणातूनच दोन तालुके वगळले का?सदस्या वंदना जाधव यांनी नंतरच्या चर्चेत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठविले असतानाही राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यांतील प्रस्ताव का मंजूर झाले नाहीत? का राजकारणातून आमचे तालुके वगळले असा थेट प्रश्न विचारला. गगनबावड्याचे सदस्य बजरंग पाटील यांनीही हाच प्रश्न यावेळी उपस्थित केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद