शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

कोल्हापूर जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत जीएसटी, कर्जमाफीवरून राजकीय खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 13:47 IST

भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्याने सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण तापले. ​​​​​​​

ठळक मुद्देआवाज वाढल्याने कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातील वातावरण तापलेगटनेते अरुण इंगवले आक्रमकराजकारणातूनच दोन तालुके वगळले का?

कोल्हापूर : भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या मंगळवारी दुपारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कॉँग्रेसचे सदस्य भगवान पाटील यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडल्याने जोरदार राजकीय खडाजंगी उडाली. एकमेकांना प्रत्युत्तर देताना आवाज वाढल्याने सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील वातावरण तापले.सभा सुरू होऊन अर्धा तास झाल्यानंतर भगवान पाटील यांनी अंगात बॅनर घालून त्यावर पाठीमागे जिल्हा परिषदेची रिकामी तिजोरी दाखविली होती; तर पुढच्या बाजूला मजकूर लिहिला होता, निवडणुकीवेळी भाजपने अनेक आश्वासने दिली. मात्र आता निधीमध्ये ३० टक्क्यांची कपात केली आहे. कर्जमाफीमध्येही शेतकऱ्यांचे हित पाहिले नाही. कृषी अवजारांवर जीएसटी लावला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणूनच ‘कितना बदल गया इन्सान’ असे म्हणण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.यावर लगेचच पक्षप्रतोद विजय भोजे सरकारच्या समर्थनार्थ उठले. दोन्ही कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने संपूर्ण देशासाठी ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र केवळ महाराष्ट्रात ३२ हजार कोटींची कर्जमाफी झाली. तुमचा गैरसमज झालाय. ५० वर्षांत जे तुमच्या सरकारला जमले नाही ते या सरकारने केले. शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी शून्य टक्के दराने पैसे दिलेत. निधी मिळणार आणि पुढच्या बैठकीला तुम्हांला हे अंगातील पोस्टर बदलावे लागणार, असे पाटील यांना ठणकावून सांगितले.गटनेते अरुण इंगवले यांनीही आक्रमक भाषेत पाटील यांना विरोध केला. पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही राजकीय रंग आणला आहे. मोदींचं सरकार आल्यापासून अनेकांच्या पोटात गोळा आलाय. मीही राष्ट्रवादीत होतोे. राज्य कर्जात बुडालं असताना शेतकऱ्यांसाठी म्हणून कर्जमाफी दिली.

याआधीच्या कर्जमाफीवेळी एक एकर शेती असणाऱ्याला दीड कोटी रुपये दिले गेले. करवीर तालुक्यात भ्रष्टाचार करून कर्जमाफी घेतली; म्हणून सदाशिराव मंडलिक यांनी त्याला विरोध केला. नागपूर अधिवेशनानंतर कात्री लावलेला निधीही परत मिळणार आहे. हा केवळ राजकीय विरोध आहे.

इंगवले बोलत असताना कॉँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बंडा माने यांनी त्यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला. ‘तुम्ही त्या कारभारात सहभागी होता ना?’ अशी विचारणा त्यांनी केली. ‘हे बोलणं बरोबर नाही’ असे त्यांनी निक्षून सांगितले. तेव्हा इंगवले यांनीही ‘त्यांना पक्ष सोडला म्हणूनच बोलतोय’ असे सांगितले.

प्रसाद खोबरे म्हणाले, राजू शेट्टी यांनी भाजपला पाठिंबा दिला म्हणून आम्ही भाजपमध्ये गेलो आणि आता जर शेट्टी भाजपला शिव्या देत असतील तर त्याला इलाज नाही. या खडाजंगीमुळे सभागृहातील वातावरण तापले. अखेर अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील-कळेकर, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी या विषयावर पडदा पाडत पुढचा विषय सुरू केला.

राजकारणातूनच दोन तालुके वगळले का?सदस्या वंदना जाधव यांनी नंतरच्या चर्चेत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव पाठविले असतानाही राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यांतील प्रस्ताव का मंजूर झाले नाहीत? का राजकारणातून आमचे तालुके वगळले असा थेट प्रश्न विचारला. गगनबावड्याचे सदस्य बजरंग पाटील यांनीही हाच प्रश्न यावेळी उपस्थित केला. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद