शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

गावाने वाळीत टाकल्याचे दुःख कोरोनापेक्षा भयानक, पन्हाळा तालुक्यातील तरुणाने मांडली वेदना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 00:25 IST

कोरोना आज आहे उद्या जाईल.आज मला झालाय,उद्या कोणालाही होईलपण लोकांनी माणुसकी जपली पाहिजे असे आवाहन त्याने केले आहे.

कोल्हापूर : आम्हाला कोरोनाची भीती वाटली नाही पण तो झाला आहे असे समजल्यावर गावाने वाळीत टाकले आणि जी आपली माणसे म्हणत होतो त्यांनीही साधा फोन करून आमची विचारपूस केली नाही याच्या मनाला खूप वेदना झाल्याची भावना पन्हाळा तालुक्यातील एका तरुणाने मंगळवारी व्यक्त केली आहे. कोरोना आज आहे उद्या जाईल.आज मला झालाय,उद्या कोणालाही होईलपण लोकांनी माणुसकी जपली पाहिजे असे आवाहन त्याने केले आहे. त्याच्यासह वडिलांनाही कोरोना झाला होता हे दोघेही त्यातून बरे होऊन घरी आल्यानंतर या तरुणाने या काळात आलेले अनुभव शेअर केले आहेत.

तो सांगतो, मी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील.वडील मुंबईत  नोकरीला होते.  ३०एप्रिलला ते निवृत्त झाले. पण लॉकडाऊन मुळे ते मुंबईतच अडकून पडले. खाजगी गाडीने गावी घेऊन आलो. त्यांना गावाबाहेरील  लॉजमध्ये कॉरंटाईन केलं. मी किंवा माझा भाऊ रोज  जेवणाचा डबा घेऊन जायचो. वडिलांना कोणतंही लक्षण नव्हतं. आठव्या दिवशी माझ्या मामांना न्युमोनीया झाला अन त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आम्ही वडिलांचीही टेस्ट केल्यावर ते पॉझिटिव्ह आले. ते ऐकून आम्ही हादरून गेलो. सगळे ओक्साबोक्सी रडायला लागले. मी सुध्दा खूप घाबरलो.वडील मात्र सगळ्यांना धीर देत होते. ते खंबीर होते. रात्री अकरा वाजता रुग्णवाहिका आली अन ते वडिलांना घेऊन गेली.

कोल्हापूरातील  नामांकीत हॉस्पिटलमधे उपचारांची चौकशी केली, तेव्हा त्यांनी यासाठी ३ लाखांचे पॅकेज असल्याचं सांगितले. डॉक्टर असलेल्या चुलत भावाने सीपीआरमध्येच दाखल व्हायला सांगितले. वडील  तिथे दाखल झाले.  दुसऱ्या दिवशी आम्हा दोघां भावाचीही कोरोना टेस्ट झाली. त्यात भाऊ निगेटीव्ह आला अन माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. पुन्हा पायाखालची जमीन सरकली. आता हे घरी सांगायचं कसं या काळजीने मला घेरलं. शेवटी हिम्मत करुन पत्नीला फोन केला. तिला शपथ घातली अन अजिबात काळजी करु नको,  सगळं ठिक होईल, फक्त आईला व पोरीला जप असं सांगितले. मी आणि वडील दोघांमधेही लक्षने काहीच दिसत नव्हती. दोघंही एकाच वेळी  सीपी आरच्या दोन वेगवेगळ्या वॉर्डमधे दाखल होतो. 

माझी परत नवव्या दिवशी टेस्ट केल्यावर मी निगेटीव्ह आलो. वडीलही बरे होऊन बाहेर आले. माझ्यासोबत ६५ ते ७० वयाच्या ३ महिला बऱ्या होऊन बाहेर पडल्या.  ज्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे तो पाचव्या दिवशीच ठणठणीत होतो. न्यूज चॅनल अन् सोशल मिडियाने कोरोनाचा खूप बाऊ केला आहे. आपलं सीपीआर लईभारी...!!आम्हाला सांगायला आनंद होतो की कोल्हापुरातील सीपीआरमध्ये खरेच कोरोनाबाधित रुग्णांची इतकी चांगली व्यवस्था आहे ,की खाजगी दवाखानेही याच्यासमोर फिके पडतील. दाखल केल्यानंतर माझी ईसीजी केली. रक्त तपासणी आणि सिटी स्कँनही केलं.   दिवसातून तीन वेळा तिथला हाऊस किपिंग स्टाफ वॉर्ड सॅनिटाइज करायचा. वेळेवर नाश्ता, चहा अन रुचकर जेवण मिळायचं. तिथला नर्सिंग स्टाफ ही सगळ्यांशी आपुलकीनं वागतो. आम्हा सगळ्यांना वेळेत औषधे दिली जात होती. ज्यांना खोकला आहे त्यांना कफ सिरप द्यायचे. एकालाही इंजेक्शन किंवा सलाईन लावलेलं नव्हतं. वय जास्त किंवा खूप त्रास असेल तरच पुढची ट्रीटमेंट केली. दवाखान्यातील वातावरण पण खूपच चांगले होते. सगळे रुग्ण आनंदी आणि मनाने खंबीर होते. 

मित्रानो हा खरा आजार..जेव्हा माझ्या वडिलांना अन मला कोरोना झालाय हे गावात समजलं, तेव्हा आम्ही रुग्णालयात असताना गावाने माझ्या कुटुंबाला अक्षरशः वाळीत टाकलं. आम्हाला कोणाच्या आर्थिक मदतीची गरज नव्हती पण अशा वेळी कुटुंबाला मानसिक आधार द्यायला हवा होता तो कोणाकडूनही मिळाला नाही. साधा फोन करुन तब्बेत कशी आहे हे कुणी विचारलं नाही. मित्राच्या वडिलांना  अर्धान्ग्वायूचा झटका आला तेव्हा खिशातले पैसे घालून त्यांच्यावर उपचार केले, पण या मित्राने साधी फोनवर चौकशीही  केली नाही.सरकारी अधिकाऱ्यांचे बरेच फोन आले त्यांनी धीर देण्यापेक्षा निष्काळजीपणा कसा केलात असेच ऐकवायचे.प्रत्यक्षात आम्ही पुरेशी दक्षता घेतली होती..

गावकऱ्यांचे फोन पण यासाठी...

गावातील काही लोकांचे फोन यायचे ते हे विचारण्यासाठी की आपण कुठे या आठ दिवसात भेटलोत का..?  आपण हस्तांदोलन केलं का..? पण आमच्या तब्बेतीबद्दल कुणीही साधी विचारपूस केली नाही. 

जीवघेणी अफवा..मला ५ वर्षांची मुलगी आहे. तिचीही तब्बेत बिघडलीय अशी अफवा गावात उठवली गेली. मला कोरोनापेक्षा या गोष्टींचा खूप त्रास झाला. खरोखर मी या काळात लोकांतील माणुसकीचा अंत पाहिला. वेळ सर्वांवर येते. अशा प्रसंगी लोकांनी धीर देणं गरजेचं असतं. 

गरज फक्त मानसिक आधाराची..हे आजारपण कुणी स्वत:हून मागून घेत नसतो. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेतली असतानाही हा आजार झाला. अशा प्रसंगी सर्वांनी त्या पेशंटला त्याच्या कुटुंबियांना मानसिक आधार द्यायची गरज असते. पेशंट मनाने खंबीर असेल तर ठिक नाहीतर लोकांच्या अशा तुसड्या वागणुकीने एखादा पेशंट वैफल्यग्रस्त होऊन टोकाचं पाऊल उचलायलाही मागे पुढे पाहणार नाही

यांचा आधार मोलाचा..!!माझ्या  कुटुंबावर  आभाळ कोसळलेलं असताना काही चांगले लोकही भेटले. मी जिथे काम करतो, त्या आदित्य बिर्ला ग्रुप मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सीपीआरमधील मानसोपचार तज्ञानी खूप आधार दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkolhapurकोल्हापूर