शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

अलमट्टीप्रश्नी १० जुलैला सांगलीत पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:42 IST

..तर आम्ही पुरात गटांगळ्या खाऊ

कोल्हापूर : कर्नाटकातील आलमट्टी धरण उंची विरोधात सरकारची भूमिका संशयास्पद वाटत आहे. म्हणूनच, १० जुलै रोजी सकाळी ११ वाजता सांगली पाटबंधारे कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेतील काॅंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.आलमट्टीप्रश्नी शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अरुण लाड, व्ही. बी. पाटील, विजय देवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पाटील म्हणाले, आलमट्टी उंची विरोधासाठी मे महिन्यात सर्व पक्षीय कृती समितीतर्फे रस्ता रोको केले. त्यानंतर राज्य सरकारने बैठक घेतली. राजकारण करण्यासाठी शासनाने आम्हाला मुंबईच्या बैठकीस निमंत्रण दिले नाही, म्हणून महाविकास आघाडीने सरकारला पत्र पाठवून आलमट्टी उंचीविरोधासाठी शासन काय करणार आहे, अशी विचारणा केली. त्यानंतरही सरकार काहीही केलेले नाही. या प्रश्नात सरकार गंभीर नाही.आता पाऊस सुरू आहे. पुराचा धोका आहे. हिप्परगी, आलमट्टी धरणावर अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याचे सांगितले जाते. पण, अधिकाऱ्यांकडून अहवाल संघर्ष समितीला मिळत नाही. वडनेर समितीचा अहवाल स्वीकारला की नाही ?, उंची वाढ विरोधासाठी शासन सर्वाेच्च न्यायालयात गेले आहे की नाही ?, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. म्हणून, पाटबंधारे कार्यालयावर १० रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.शेट्टी म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील पूर येऊ नये, म्हणून हिप्परगी, आलमट्टी धरणांतील पाण्याचा विसर्ग गतीने झाला पाहिजे. याकडे शासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही. शासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावरची लढाई तीव्र करावी लागेल. विधानसभा अधिवेशनातही याकडे लक्ष वेधावे लागेल. यासाठी १० जुलै रोजीच्या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.दरम्यान, आलमट्टी प्रश्नीच्या बैठकीत आमदार लाड, माजी आमदार उल्हास पाटील, कृष्णा महापूर नियंत्रण सर्जेराव पाटील, इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांची भाषणे झाली.

..तर आम्ही पुरात गटांगळ्या खाऊपूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेकडून पहिल्या टप्प्यात कर्ज मिळाले आहे. यातून कोल्हापूर, सांगली, इचलकरंजीतील गटारर्सची कामे करण्यात येणार आहे. गटर्स बांधण्यास विरोध नाही. पण, गटर्सचे बांधकाम करून पूर नियंत्रण होणार नाही. आम्ही पुरात गटागंळ्याच खाऊ, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.