शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शक्तिपीठाबाबत सरकारच्या वल्गनाच, महामार्ग अशक्यच; राजू शेट्टी यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:58 IST

सरकारने फेरविचार करावा - सतेज पाटील 

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यांत बैठका घेतल्या आहेत, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून सरकारने कितीही वल्गना केल्या तरी महामार्ग होणे अशक्यच असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. शक्तिपीठाबाबत सरकारने फेरविचार करावा, असे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.समृध्दी महामार्ग शेवटच्या टप्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी समृध्दी महामार्गाचे काम लवकरच करू, असे सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आले. याबाबत, राजू शेट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले, शेतकऱ्यांना सरकारची मखलाशी समजल्याने ते सर्व्हे करण्यासही विरोध करत आहेत. ड्रोनव्दारे सर्व्हे केले तर ड्रोन पाडण्याचा इशारा शेतकरी देत असल्याने मोजणी यंत्रणा ठप्प आहे. सुरुवातीला देवाधर्माचे नाव केले आता सरकार विकासाची भाषा करत आहे. हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे.सरकारने फेरविचार करावा - पाटील आमदार सतेज पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गालाकोल्हापूरसह सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. लोकभावनेचा आदर करुन सरकारने फेरविचार करावा. तेच पैसे ग्रामीण भागातील रस्त्यासाठी खर्च केले तर अधिक चांगले होईल. शासनाला आम्ही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. त्याचा विचार करून शक्तिपीठचा अट्टाहास सोडावा. आमच्या माहितीनुसार कामे पूर्ण करुनही ८० हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. संबंधितांना हे पैसे दिले तर इतर कामांना गती येईल. शक्तिपीठऐवजी आम्ही पर्यायी रस्ते सुचवले आहेत, त्याचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले होईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गRaju Shettyराजू शेट्टीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलGovernmentसरकारMahayutiमहायुती