शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गोपाळराव काँग्रेसचा झेंडा पुन्हा हातात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

(गोपाळराव पाटील यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला ...

(गोपाळराव पाटील यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील भाजपचे नेते गोपाळराव पाटील हे त्या पक्षाला राजीनामा देणार असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) किंवा जिल्हा बँकेतील सत्तेचा वाटा त्यांना खुणावत असल्याने अगोदरच फज्जा शिवलेला बरा म्हणून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील व गोपाळराव हे जुने गट त्यानिमित्ताने एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानण्यात येते.

चंदगड तालुक्याच्या राजकारणात एकेकाळी गोपाळराव पाटील यांचा प्रबळ गट होता. त्यांनी विधानसभा निवडणुकीतही दोनवेळा धडक दिली. परंतु, यश मिळाले नाही. आजही त्यांच्याकडे किमान २५ हजार मतांचा गट आहे. सामान्य कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल ओढ आहे. परंतु, हातात कोणतीच सत्ता नसल्याने त्यांची राजकारणात पीछेहाट आणि कोंडीही झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. हा मतदारसंघ युतीच्या वाटणीत शिवसेनेच्या वाट्याला जाणार हे भाजपला उमगले नाही. त्यामुळे या सर्वांना अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याची पाळी आली. पुढे राज्याच्या सत्तेतूनही भाजप हद्दपार झाला. राज्यातील सरकारमध्ये काही गडबड होईल, अशीही स्थिती नाही. त्यामुळे पुन्हा पाच वर्षे भाजपसोबत विरोधात राहण्याची गोपाळराव यांची मानसिकता नाही. त्यामुळेच भाजपला रामराम करून काँग्रेसचा झेंडा ते पुन्हा हातात घेतील, असे चित्र दिसते.

पालकमंत्री सतेज पाटील हेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांना पक्षाचे संघटन बळकट करायचे आहे. काँग्रेसमध्ये सध्या ओमसाई आघाडीचे संभाजीराव देसाई हे काँग्रेसचे काम करत आहेत. गोपाळराव पाटील यांच्यासारखा नेता काँग्रेसमध्ये आल्यास पक्षालाही आगामी निवडणुकीत चांगले यश मिळू शकते. जिल्ह्यात गोकुळ व जिल्हा बँक ही महत्त्वाची सत्तास्थाने आहेत. आमदार राजेश पाटील व दीपक भरमू पाटील हे गोकुळचे संचालक आहेत. आमदार पाटील हे पालकमंत्री पाटील यांच्यासोबत राहतील, त्यामुळे गोकुळमध्ये संधी मिळाली नाही तरी गोपाळराव हे जिल्हा बँकेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार ठरू शकतात.