शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

देवाच्या दारी रुग्णांच्या असहाय्यतेची वाटमारी फसवणुकीचा फंडा : दादा... तुम्हाला काय हो झालंय हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच काय नृसिंहवाडीपासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बोगस औषधाच्या नावाखाली देवाच्या दारातच ...

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच काय नृसिंहवाडीपासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बोगस औषधाच्या नावाखाली देवाच्या दारातच वाटमारी सुरु असल्याचे उघड झाले आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त १० फेब्रुवारीला प्रसिध्द केल्यानंतर असाच प्रकार आपल्या बाबतीतही घडल्याचे अनेक लोकांचे फोन आले.

मंदिरात तुम्ही लंगडत जाताना पाहिले की, एजंट तुम्हाला नक्कीच गाठतो. अपंगत्व, त्वचेचे आजार, डोक्यावर कमी केस अशा बाह्य तक्रारी दिसणाऱ्या व्यक्तिंनाच हेरले जाते. ‘दादा, तुम्हाला काय हो झालंय हे...’ असे म्हणत आस्थेने विचारपूस केली जाते. हे आमच्याही वडिलांना झाले होते. त्यांना खूप त्रास होता... आम्ही बघा... इचलकरंजीजवळच्या धनगरी बाबांकडून औषध आणले आणि गुण आला. आता ते पाच किलोमीटर रोज चालतात, असे सांगून जाळ्यात ओढले जाते. कोल्हापुरातील जाहिरात एजन्सीशी संबंधित कुटुंबालाही असाच अनुभव जयसिंगपूरमध्ये आला. तिथे एका चौकात भडंग घ्यायला ते थांबले होते. त्यांच्या पतीला त्वचारोगाचा त्रास होता. एजंटाने सांगितले की, आमच्या भावालाही असाच त्रास होता. त्यामुळे बहिणींची लग्ने ठरत नव्हती. आम्ही त्या बाबाकडून मलम आणले आणि त्रास बंद झाला. फोन करून दोन दिवसांत तो एजंट त्यांच्या घरापर्यंत आला. घरी आल्यावर २ किलो खोबरेल तेल, २५ गुलाब, आणि २५ ग्रॅमचा काढा गॅसवर उकळलायला लावला. ५ नारळ देवाजवळ ठेवायला लावले. काढा उकळल्यावर त्यात थोडी आयुर्वेदिक औषधे घालायला लागतात म्हणून उकळलेल्या तेलाच्या भांड्यासह त्यांना घेऊन कोल्हापुरातील महालक्ष्मी बँकेच्या शेजारच्या इमारतीत घेऊन आला. तिथे आयुर्वेदिक दुकानातील विविध प्रकारची औषधे घ्यायला लावली. त्याचे बिल २० हजार रुपये झाले. हे बिल पाहून संबंधित व्यक्तीच्या पत्नीने आपण एक महिन्याचे दहा हजारांचे औषध घेऊ, असे सुचविल्यावर ‘ताई, तुम्ही आपल्या माणसासाठी दहा हजारांकडे कशाला पाहताय’, असे मानसिक ब्लॅकमेलिंग केले व सर्वच औषधे घ्यायला लावली. खोबरेल तेल असल्याने पंधरा दिवस त्वचा मऊ पडण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही लाभ या औषधाचा झाला नाही. परंतु, त्यांना २० हजारांना गंडा बसला. त्या एजंटाचा फोन नंबर नंतर कायमचाच बंद झाला. साधारणत: फसवणुकीची धाटणी अशी आहे. ज्यांना यातील मेख माहीत आहे, अशा काही जागरुक लोकांनी ‘तुला पोलिसांकडे नेऊ का’, अशी दटावणी दिल्यावर एजंट पसार झाल्याचेही अनुभव आहेत.

लुटीची साखळीच..

अशाप्रकारची फसवणूक व्यक्तिगत पातळीवर होते. ज्याची फसवणूक होते तो त्याबद्दल तक्रार करून प्रकरण धसास लावण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे दिवसभरात रोज एक-दोन लोकांची जरी अशी फसवणूक झाली तरी त्यातून त्यांचा खिसा गरम होतो. औषध दुकानदार व एजंटांची ही भक्कम साखळी असल्याचे दिसते.