शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

देवाच्या दारी रुग्णांच्या असहाय्यतेची वाटमारी फसवणुकीचा फंडा : दादा... तुम्हाला काय हो झालंय हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:23 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच काय नृसिंहवाडीपासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बोगस औषधाच्या नावाखाली देवाच्या दारातच ...

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरच काय नृसिंहवाडीपासून महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी रुग्णांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बोगस औषधाच्या नावाखाली देवाच्या दारातच वाटमारी सुरु असल्याचे उघड झाले आहे. ‘लोकमत’ने या संदर्भातील वृत्त १० फेब्रुवारीला प्रसिध्द केल्यानंतर असाच प्रकार आपल्या बाबतीतही घडल्याचे अनेक लोकांचे फोन आले.

मंदिरात तुम्ही लंगडत जाताना पाहिले की, एजंट तुम्हाला नक्कीच गाठतो. अपंगत्व, त्वचेचे आजार, डोक्यावर कमी केस अशा बाह्य तक्रारी दिसणाऱ्या व्यक्तिंनाच हेरले जाते. ‘दादा, तुम्हाला काय हो झालंय हे...’ असे म्हणत आस्थेने विचारपूस केली जाते. हे आमच्याही वडिलांना झाले होते. त्यांना खूप त्रास होता... आम्ही बघा... इचलकरंजीजवळच्या धनगरी बाबांकडून औषध आणले आणि गुण आला. आता ते पाच किलोमीटर रोज चालतात, असे सांगून जाळ्यात ओढले जाते. कोल्हापुरातील जाहिरात एजन्सीशी संबंधित कुटुंबालाही असाच अनुभव जयसिंगपूरमध्ये आला. तिथे एका चौकात भडंग घ्यायला ते थांबले होते. त्यांच्या पतीला त्वचारोगाचा त्रास होता. एजंटाने सांगितले की, आमच्या भावालाही असाच त्रास होता. त्यामुळे बहिणींची लग्ने ठरत नव्हती. आम्ही त्या बाबाकडून मलम आणले आणि त्रास बंद झाला. फोन करून दोन दिवसांत तो एजंट त्यांच्या घरापर्यंत आला. घरी आल्यावर २ किलो खोबरेल तेल, २५ गुलाब, आणि २५ ग्रॅमचा काढा गॅसवर उकळलायला लावला. ५ नारळ देवाजवळ ठेवायला लावले. काढा उकळल्यावर त्यात थोडी आयुर्वेदिक औषधे घालायला लागतात म्हणून उकळलेल्या तेलाच्या भांड्यासह त्यांना घेऊन कोल्हापुरातील महालक्ष्मी बँकेच्या शेजारच्या इमारतीत घेऊन आला. तिथे आयुर्वेदिक दुकानातील विविध प्रकारची औषधे घ्यायला लावली. त्याचे बिल २० हजार रुपये झाले. हे बिल पाहून संबंधित व्यक्तीच्या पत्नीने आपण एक महिन्याचे दहा हजारांचे औषध घेऊ, असे सुचविल्यावर ‘ताई, तुम्ही आपल्या माणसासाठी दहा हजारांकडे कशाला पाहताय’, असे मानसिक ब्लॅकमेलिंग केले व सर्वच औषधे घ्यायला लावली. खोबरेल तेल असल्याने पंधरा दिवस त्वचा मऊ पडण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही लाभ या औषधाचा झाला नाही. परंतु, त्यांना २० हजारांना गंडा बसला. त्या एजंटाचा फोन नंबर नंतर कायमचाच बंद झाला. साधारणत: फसवणुकीची धाटणी अशी आहे. ज्यांना यातील मेख माहीत आहे, अशा काही जागरुक लोकांनी ‘तुला पोलिसांकडे नेऊ का’, अशी दटावणी दिल्यावर एजंट पसार झाल्याचेही अनुभव आहेत.

लुटीची साखळीच..

अशाप्रकारची फसवणूक व्यक्तिगत पातळीवर होते. ज्याची फसवणूक होते तो त्याबद्दल तक्रार करून प्रकरण धसास लावण्याच्या फंदात पडत नाही. त्यामुळे दिवसभरात रोज एक-दोन लोकांची जरी अशी फसवणूक झाली तरी त्यातून त्यांचा खिसा गरम होतो. औषध दुकानदार व एजंटांची ही भक्कम साखळी असल्याचे दिसते.