शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
4
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
5
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
6
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
7
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
8
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
9
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
10
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
11
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
12
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
13
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
14
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
16
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
17
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
19
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
20
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत

कोरोनावर होमिओपॅथीला उपचाराची संधी द्या --डॉ. विजयकुमार माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:49 IST

कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे रुग्ण नव्हे -- एखाद्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू आढळला तर तो कोरोनाचा रुग्ण नव्हे. त्याची प्रकृती उत्तम असेल तर त्याला तुम्ही आजारी का समजता? तो आजारी पडला तरच धोका आहे; अन्यथा घाबरण्याची गरज नाही.

ठळक मुद्देचर्चेतील मुलाखत 

कोल्हापूर : कोरोना विषाणूवर अजून कोणतीही लस आली नाही, असे सारे जग म्हणते; परंतु आमचा दावा आहे की, तुम्ही होमिओपॅथीला एक संधी द्या. आम्ही कोरोनाचा रुग्ण नक्की बरा करून दाखवितो, असा दावा भारतातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विजयकुमार माने यांनी केला. आम्ही त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री व आयुष मंत्रालयाशी गेले दोन महिने वारंवार संपर्कात आहोत.

अनेक वेळा त्यांना रीतसर मेल पाठविले. आयुष मंत्रालय मेलही स्वीकारायला तयार नाही. त्यांनी ‘यासाठी आम्ही वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली आहे, ती निर्णय घेईल,’ असे सांगितले. रुग्ण लाखाच्या घरात गेले, मृत्यूंची संख्या रोज वाढत आहे; परंतु या समितीचा काही निर्णय होत नसल्याचा अनुभव येत आहे. आम्ही गेल्या दोन महिन्यांत एक हजार लोकांना होमिओपॅथीची औषधे वापरली. त्यांतील कुणीही आजारी पडलेले नाही. त्यांची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्या दाव्याला संशोधनाचा, आमच्या २५ वर्षांच्या अनुभवाचा आधार आहे. तुम्ही त्यांची तपासणी करू शकता; पण कोरोनावर उपचार करण्याची संधी द्या, असा डॉ. माने यांचा आग्रह आहे.

प्रश्र्न : कोरोनावरील उपचाराची स्थिती सध्या कशी आहे?

डॉ. माने : कोरोना या आजाराबद्दल समाजात नको तेवढी भीती निर्माण केली जात आहे. आजपर्यंत आपल्याला कधीच पीपीई किटची माहिती नव्हती. ज्यावेळी सुरुवातीला रुग्ण कमी होते तेव्हा आम्ही १०० टक्के लॉकडाऊन केले आणि आता रुग्ण वाढू लागल्यावर लोक रस्त्यांवर आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने हा साथीचा रोग असल्याचे जाहीर केले; परंतु ते चुकीचे आहे. हा साथीचा रोग असता तर जगभरातील रुग्णांची संख्या खूप वाढली असती. पण चित्र तसे नाही. या रोगाला आपण सामोरे जाऊया आणि चांगले उपचार करूया. त्याची अनावश्यक भीती बाळगण्याचे कारण नाही.

प्रश्न : होमिओपॅथीद्वारे उपचाराचा दावा आपण कशाच्या आधारे करता?

डॉ. माने : आमच्याकडे त्यासंबंधीचे काही पुरावे आहेत. हिपॅटिटस बी, एचआयव्ही आणि एचबीव्हीच्या रुग्णांनाही आम्ही उपचार करतो. एचआयव्हीच्या रुग्णांचा व्हायरल लोड आमच्या उपचारामुळे शून्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिपॅटिटस बी व एचबीव्हीमध्ये हा लोड तीन कोटी किंवा ३० कोटी असू शकतो; परंतु तुम्ही आजारी पडलेला नसाल तर त्याला भीती बाळगण्याची गरज नाही. कोरोनामध्येही तसेच आहे. या विषाणूवर कोणती लस शोधल्याचा आमचा दावा नाही; परंतु रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद होमिओपॅथीमध्ये आहे आणि त्याच आधारावर आमचा या उपचारासाठी आग्रह आहे.

प्रश्न : कोरोनामुळे मृत्यू झाले हे कसे नाकारता येईल?

डॉ. माने : कोरोनामुळे मृत्यू झाले; परंतु त्याचा मृत्युदर तपासून पहा. तो आजार आता समजला जातो तेवढा गंभीर नाही. क्षयरोग, मलेरिया, एचआयव्हीपेक्षा त्याचा मृत्युदर कमी आहे. आजार कणभर असताना त्याचा प्रचार मणभर झाल्यामुळे लोकांत भीती पसरली. ही भीती पसरवण्यात सोशल माध्यमांचा वाटा मोठा आहे. कोविड हा एवढा मोठा आजार नाही आणि असेल तर त्याच्यावर उपचार करून त्याला सामोरे गेले पाहिजे आणि आमच्याकडे त्याच्यावरील उपचार उपलब्ध आहेत. त्यातून रुग्ण बरा होऊ शकतो, हे आम्ही जिल्हा प्रशासन व राज्य व केंद्र सरकारनाही सांगितले; परंतु ते दखलच घ्यायला तयार नाहीत. म्हणून आमचे सांगणे हेच आहे की, तुम्ही लोकांवर उपचार करा आणि त्यांना बरे करा. त्यासाठी लॉकडाऊनचीही गरज नाही. ते केल्यामुळे तुमची अर्थव्यवस्था कोलमडली. नवे प्रश्न तयार झाले.

 

कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे रुग्ण नव्हे

एखाद्याच्या शरीरात कोरोनाचा विषाणू आढळला तर तो कोरोनाचा रुग्ण नव्हे. त्याची प्रकृती उत्तम असेल तर त्याला तुम्ही आजारी का समजता? तो आजारी पडला तरच धोका आहे; अन्यथा घाबरण्याची गरज नाही. यामागे लस कंपन्यांचे अर्थकारणही कारणीभूत आहे. देशात आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला त्यांतील ७९ टक्के रुग्णांना काही ना काही इतर आजार होते. एका बाजूला तुम्ही कोरोनावर उपचार नाही म्हणता आणि मग कित्येक रुग्ण उपचारानंतर बरे होऊनही घरी गेले आहेत. आमचे म्हणणे तेच आहे, की त्यांच्यावर उपचार करूया आणि त्याची संधी होमिओपॅथीलाही द्या.

डॉ. विजयकुमार माने

 

टॅग्स :docterडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGovernmentसरकार