शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंना भारतरत्न द्या

By admin | Updated: August 3, 2015 00:01 IST

रामदास आठवले : खासदार फंडातून स्मारकाला २५ लाख देणार

वाटेगाव : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी खासदार रामदास आठवले यांनी केली. तसेच खावाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या अभिवादन मेळाव्यात ते बोलत होते.आठवले म्हणाले, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी प्रतिकूल परिस्थितीत देश स्वतंत्र होण्यासाठी शाहिरीतून, साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचे योगदान आहे. अशा या साहित्यरत्नाला २६ जानेवारीपर्यंत भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व सर्व समाजाच्यावतीने सरकारकडे मागणी करणार आहे. याबाबत महाराष्ट्र शासनानेही केंद्र सरकारकडे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुुरस्कार द्यावा, यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन केले. अण्णा भाऊंच्या स्मारकासाठी माझ्या खासदार फंडातून २५ लाखांचा निधी देऊ, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच ते म्हणाले की, याकूब मेमनच्या फाशीसंदर्भात छोटा शकीलने केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. देशावर कोणी घाव घालत असेल तर, त्याचा डाव उलटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत म्हणाले, कोणत्याही विद्यापीठाची पदवी न घेता लोकशाहीर अण्णा भाऊंनी वास्तवाला धरून लिखाण केले. ते आयुष्यभर समाजासाठी कार्यरत राहिले. त्यांचे साहित्य सातासमुद्रापार पोहोचले. राज्यसभा खासदार रामदास आठवले व लोकसभा खासदार राजू शेट्टी यांनी अण्णा भाऊ यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, यासाठी प्रयत्न करावा. राज्यपाल व देशात एकाच विचाराचे सरकार आहे. म्हणून या मागणीला शासनाने व दोन्ही खासदारांनी न्याय द्यावा, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. प्रारंभी खासदार आठवले, आ. नाईक, सदाभाऊ खोत यांनी अण्णा भाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी अण्णा भाऊ साठे व शंकर भाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. त्यांची आरपीआय मातंग आघाडीच्या सचिवपदी निवड केल्याची घोषणा खा. आठवले यांनी केली. यावेळी वाळवा तालुका आरपीआयचे अध्यक्ष अरुण कांबळे व फकिरा साठे यांचा सत्कार खा. आठवले यांच्याहस्ते करण्यात आला.शंकरराव साठे, जगन्नाथ ठोकळे, शहाजी कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाटेगावचे उपसरपंच प्रमोद साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल महाडिक, किशोर तपासे, नवनाथ कांबळे, शहाजी कांबळे, मंगलराव म्हाळगे, बाळासाहेब बनसोडे, उत्तम कांबळे, अशोक गायकवाड, आप्पा वायदंडे, सुधीर कांबळे, प्रदीप साठे, आशिष जाधव, किरण साठे, दिनेश जाधव, एकनाथ चव्हाण, अजित साठे, विनोद जाधव आदी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन वाळवा तालुका आरपीआय, वीर फकिरा गु्रप, अण्णा भाऊ साठे लेझीम दांडपट्टा मंडळ व प्रबुद्ध गु्रप यांनी केले. (वार्ताहर)आमदार फंडातून पाच लाखमहाराष्ट्राच्या लढ्यातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. वाटेगाव येथील युतीच्या काळात उभारलेल्या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी व सुशोभिकरणासाठी माझ्या आमदार फंडातून ५ लाख रुपये निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली, आमदार शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली.