शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांमधील नैराश्यावर भाष्य करणारा ‘गिल्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 23:03 IST

चित्रपट बघून नवे शिकायचा प्रयत्न : तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात, नेहमी एक चांगला विद्यार्थी बनायचा प्रयत्न करा! चित्रपट क्षेत्रात चांगला विद्यार्थी बनायचं असेल तर चांगले चित्रपट बघणे आणि त्यातून नवे शिकायचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देकथेमधील प्रत्येकाला संशय आहे की, तोच या आत्महत्येला जबाबदार आहे.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : राष्ट्रीय स्पर्धेत पारितोषिक राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील दिगंत संभाजी पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘गिल्ट’ या संहितेला १० लाखांचे पारितोषिक मिळाले आहे. यानिमित्त त्यांची ही चर्चेतील मुलाखत...

प्रश्न : आपली कौटुंबिक पार्श्वभूमी व या क्षेत्राविषयी आवड कशी निर्माण झाली?उत्तर : सरवडे हे माझ मूळ गाव असले तरी लहानपण साताऱ्यात गेले. आई-बाबा दोघेही साताºयात यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये प्रोफेसर होते. दोघांनाही वाचनाची खूप आवड असल्याने मला आणि बहिणीलाही याची गोडी लागली. बाबा उत्तम गायक असल्याने संगीताचं वातावरण होतं. मी तबलावादनदेखील शिकलो आहे. पुढे शिक्षणासाठी पुण्यात गेल्यानंतर फिल्म मेकिंगशी ओळख झाली. फिल्म मेकिंगमधील लेखनाची बाजू मला सर्वांत जवळची वाटली आणि मी त्याचा अभ्यास केला. दरम्यान, एम. एस्सी. करून आयआयटी, बॉम्बे येथे रिसर्च करू लागलो; पण चित्रपटांची आवड स्वस्थ बसू देईना. त्यामुळे मी ते क्षेत्र सोडून पूर्णवेळ लेखनाकडे वळालो.

प्रश्न: ‘गिल्ट’ संहितेबद्दल काय सांगाल?उत्तर : ‘आयआयटी’च्या दरम्यान कॅम्पसच्या आयुष्याची छाप माझ्यावर पडली होती. तसेच तणावामुळे विद्यार्थ्यांना येणारे डिप्रेशन आणि त्यांचे मानसिक स्वास्थ्याचे प्रश्न मी जवळून पाहिले होते. त्यामधूनच ‘गिल्ट’ या संहितेबद्दलचे विचार सुरू झाले. या कथेमध्ये एक आत्महत्या होते; पण आत्महत्येचं कारण स्पष्ट होत नाही. कथेमधील प्रत्येकाला संशय आहे की, तोच या आत्महत्येला जबाबदार आहे. प्रत्येकाच्या विविधांगी ‘गिल्ट’चा हा प्रवास आहे.

चित्रपट बघून नवे शिकायचा प्रयत्नतबलावादक उस्ताद झाकीर हुसेन म्हणतात, नेहमी एक चांगला विद्यार्थी बनायचा प्रयत्न करा! चित्रपट क्षेत्रात चांगला विद्यार्थी बनायचं असेल तर चांगले चित्रपट बघणे आणि त्यातून नवे शिकायचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.

भविष्यात काय करायचे नियोजन आहे.?सध्या मी ‘प्रेमाचा गेम सेम टू सेम’ या मालिकेचे संवादलेखन करीत आहे. तसेच एक इंग्रजी कादंबरीही लिहिली असून ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे. चित्रपटांबद्दल शिकत राहणं आणि संहिता लिहीत राहणं हेच सध्याचं नियोजन आहे. लिहिलेली संहिता पडद्यावर येणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न कायमच असणार आहेत. माझी स्वत:ची या क्षेत्रात आत्ता कुठे सुरुवात आहे आणि अजून खूप गोष्टी शिकायच्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcinemaसिनेमा