शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घाटगेंच्या निर्णयाने कागलच्या राजकारणात फरक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

(संजय घाटगे व समरजित घाटगे यांचे फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा ...

(संजय घाटगे व समरजित घाटगे यांचे फोटो वापरावेत)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : माजी आमदार संजय घाटगे यांनी विधानसभा निवडणूक पुन्हा लढवणार नाही, या जुन्याच घोषणेचा पुनरुच्चार केला असला तरी त्यामुळे कागल तालुक्याच्या राजकारणात तूर्त फारसा फरक पडण्याची चिन्हे नाहीत. दोन्ही घाटगे जोपर्यंत विश्वासाने व एकदिलाने एकत्र येत नाहीत तोपर्यंत नवे काही घडण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखान्यासह अन्य निवडणुकीत सोयीनुसार संजय घाटगे गटाची भूमिका निश्चित होईल.

माजी आमदार संजय घाटगे यांनी बाचणी (ता. कागल) येथे शनिवारी भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे दुसऱ्यांदा जाहीर केले. त्यांनी गेल्यावेळेच्या निवडणुकीतही आपली ही शेवटचीच निवडणूक असल्याने गुलाल द्यावा, असे भावनिक आवाहन केले होते. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यांनी आतापर्यंत पाचवेळा निवडणूक लढवली व त्यात त्यांना एकदाच ११ महिन्यांची आमदारकी मिळाली. फारशी सत्ता नसतानाही गट टिकवून ठेवण्यात मात्र ते यशस्वी झाले आहेत. खरेतर गेल्या निवडणुकीतच त्यांनी थांबून अंबरिश घाटगे यांनी विधानसभा लढवावी, असा कार्यकर्त्यांत सूर होता. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवणार नाही म्हटले, त्यात नवीन काही नाही. नवीन हेच आहे की, त्यांनी विधानसभेच्या रणांगणातून माघार घेतल्यावर कुणाच्या पाठीशी राहणार हे मूळचा घाटगे एकत्र येऊन पुढील राजकारण होणार असेल तर त्यांच्या माघार घेण्याला फारच महत्त्व आहे. परंतु, तसे चित्र दिसत नाही. कारण, संजय घाटगे व समरजित घाटगे यांच्यात मनोमिलन नाही. परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण नाही. विधानसभेला शिवसेनेची उमेदवारी मला मिळाली असल्याने समरजित यांनी बंडखोरी न करता थांबावे व आपल्याला पाठिंबा द्यावा, असे संजय घाटगे यांना वाटत होते. परंतु, समरजित यांनी विधानसभेची तयारी केली होती. पक्षाने त्यांना उमेदवारीही देण्याचे कबूल केले होते. त्यामुळे आता माघार नाही, या भूमिकेतून त्यांनी निवडणूक लढवली व त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाची ९० हजार मते मिळवली. आताही तालुक्याच्या राजकारणात तीन प्रमुख गटांच्या विरोधात ते लढत आहेत. त्यामुळे पुढील विधानसभाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे अशीच होऊ शकते. तशी संजय घाटगे यांना या लढतीत विजयाची स्पेस नव्हतीच, त्यामुळे त्यांनी त्यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला, हे चांगलेच झाले. आता कारखाना उभारणीतून ते गट मजबूत करण्यावर लक्ष देऊ शकतील.

विधानसभेबाबत अजून संभ्रम..

संजय घाटगे यांचे राजकीय वारसदार अंबरिश घाटगे हे सध्या गोकुळ दूध संघाचे संचालक आहेत. जिल्हा परिषदेतही त्यांना सत्ता मिळाली आहे. नुसतेच वैरत्व पत्करून हाती काही लागत नाही, अशी कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. विरोधात राहिलो तर सत्ताही नाही व कामेही होत नाहीत. त्यामुळे या गटाची कामे सध्या मुश्रीफ यांच्या माध्यमातून होत आहेत. विधानसभा अजून तशी लांब आहे. परंतु, त्यावेळी स्थिती कशी निर्माण होते यावर अंबरिश घाटगे यांचा विधानसभा लढवण्याचा निर्णय अवलंबून असेल.