शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट: सुकुमार कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 10:01 IST

प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगायचे हे शिकविले जाते.

ठळक मुद्देधम्म दीक्षा, धम्म परिषद : बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन

कोल्हापूर : नागरिकत्व दुरुस्ती व नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या माध्यमातून हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव आणि भारतीय घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. तो रोखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांनी रविवारी येथे केले.

दसरा चौक मैदानावर बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धार्थनगरतर्फे धम्मदीक्षा व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘सद्य:स्थिती पर्याय- बौद्ध धम्म’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. रघुनाथ कांबळे, बाळासाहेब भोसले, एस. पी. कांबळे, सुबोधकुमार कोल्हटकर, सुशील कोल्हटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगायचे हे शिकविले जाते. बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित असल्याने तो काळानुरूप होणारे बदल स्वीकारतो. या धम्माच्या विस्तारासाठी खेड्यापाड्यांत जाऊन बारा बलुतेदारांनाही हा धम्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. यासाठी अशा धम्म परिषदा आता खेड्यांमध्ये घेण्याची गरज आहे. हा देश बौद्धमय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दरम्यान, पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता सिद्धार्थनगर येथे धम्म रॅलीचे उद्घाटन झाले. येथून ही रॅली दसरा चौक येथील धम्म परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी १२ वाजता भन्ते आर. आनंद (वसगडे), भन्ते एस. संबोधी (आजरा), भन्ते राहुल (औरंगाबाद) यांच्या हस्ते सुमारे ५० जणांना बौद्ध दीक्षा देण्यात आली. दुपारी दोन वाजता ‘आम्ही भीमयात्री’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर