शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव बदलण्याचा घाट: सुकुमार कांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 10:01 IST

प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगायचे हे शिकविले जाते.

ठळक मुद्देधम्म दीक्षा, धम्म परिषद : बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजन

कोल्हापूर : नागरिकत्व दुरुस्ती व नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या माध्यमातून हिंदुत्ववाद्यांकडून देशाचे नाव आणि भारतीय घटना बदलण्याचा घाट घातला जात आहे. तो रोखण्याची गरज आहे, असे प्रतिपादन डेमोक्रॅटिक पार्टी आॅफ इंडियाचे संस्थापक प्रा. सुकुमार कांबळे यांनी रविवारी येथे केले.

दसरा चौक मैदानावर बौद्ध प्रणाली चॅरिटेबल ट्रस्ट, सिद्धार्थनगरतर्फे धम्मदीक्षा व धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते ‘सद्य:स्थिती पर्याय- बौद्ध धम्म’ या विषयावरील व्याख्यानात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. रघुनाथ कांबळे, बाळासाहेब भोसले, एस. पी. कांबळे, सुबोधकुमार कोल्हटकर, सुशील कोल्हटकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे माणसांचा शोध आहे. बुद्धांनी त्रिशरण, पंचशील व अष्टांग तत्त्वांतून जगाला प्रेरणा दिली. जग सुखी व्हायचे असेल तर बुद्धांशिवाय पर्याय नाही. बुद्धांच्या अष्टांगांमध्ये माणसाने कसे वागायचे व कसे जगायचे हे शिकविले जाते. बौद्ध धम्म हा विज्ञानावर आधारित असल्याने तो काळानुरूप होणारे बदल स्वीकारतो. या धम्माच्या विस्तारासाठी खेड्यापाड्यांत जाऊन बारा बलुतेदारांनाही हा धम्म स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याची गरज आहे. यासाठी अशा धम्म परिषदा आता खेड्यांमध्ये घेण्याची गरज आहे. हा देश बौद्धमय होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दरम्यान, पहिल्या सत्रात सकाळी १० वाजता सिद्धार्थनगर येथे धम्म रॅलीचे उद्घाटन झाले. येथून ही रॅली दसरा चौक येथील धम्म परिषदेच्या ठिकाणी नेण्यात आली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. दुपारी १२ वाजता भन्ते आर. आनंद (वसगडे), भन्ते एस. संबोधी (आजरा), भन्ते राहुल (औरंगाबाद) यांच्या हस्ते सुमारे ५० जणांना बौद्ध दीक्षा देण्यात आली. दुपारी दोन वाजता ‘आम्ही भीमयात्री’ हा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम झाला. 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर