शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, तरी कर्नाटक एसटी फायद्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 17:38 IST

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : बेंगलोर शहर आणि परिसरातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाची वातानुकूलित वज्रा व्हॉल्वो बससेवा देशात पहिल्यांदा ...

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : बेंगलोर शहर आणि परिसरातील आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी उच्च दर्जाची वातानुकूलित वज्रा व्हॉल्वो बससेवा देशात पहिल्यांदा सुरू करून यशस्वीपणे चालविली जाते, असा दावा बेंगलोर परिवहन महामंडळाने केला आहे.सध्या तिथे रोज या सेवेच्या ६५८ बसफेऱ्या आहेत. कर्नाटकात प्राथमिक, माध्यमिक, अनुसूचित, जाती, जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बससेवा दिली जाते. याउलट महाराष्ट्रातील बससेवा दिवसेंदिवस विस्कळीत होत राहिली. म्हणूनच कर्नाटकातील बससेवा महाराष्ट्रापेक्षा भारी, अशी सहज प्रतिक्रिया उमटते.बेंगलोरमध्ये देशात सर्वप्रथम २००६मध्ये आयटीतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधेची बससेवा सुरू केली. ती चांगल्याप्रकारे सुरू असून, त्यातून चांगले उत्पन्नही मिळत आहे. आंतरराज्य, कर्नाटक अंतर्गत सुरक्षित, परवडणारी, दर्जेदार, विनम्र, खात्रीशीर बससेवा देण्यावर अधिक भर दिला जात आहे. विशेषत: लांब पल्ल्याच्या बसमध्ये स्वच्छता ठेवली जाते. यासाठी तेथील सर्व पक्षांच्या सरकारचे आर्थिक पाठबळ राहिले.कर्नाटकात महामंडळाचे चार विभागांत विभाजन झाल्याने प्रशासकीय कामकाज गतीने होते. प्रत्येक विभागासाठी वेगळी व्यवस्थापकीय समिती कार्यरत आहे. त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींसह आयएएस, आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे राज्यभर प्रवासी केंद्रित सेवा देणे शक्य झाले आहे. महाराष्ट्रात मात्र लोकप्रतिनिधींमधील दूरदृष्टीचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञान वापराबद्दलची उदासीनता, पारदर्शकतेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे येथील एसटीची चाके गाळातच रूतत चालली आहेत.दृष्टिक्षेपात सवलतीकर्नाटक : स्वातंत्र्यसैनिकांना मोफत प्रवास, व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष ॲप, सुरक्षिततेसाठी ५ हजार बसमध्ये आणि प्रमुख बसस्थानकांत सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित, निमआराम बससेवा, ऑनलाईन बुकिंग, पर्यटनासाठी पॅकेज, नोकरदार पास योजना, पूर्णपणे मोफत सुविधेव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात एकदाच सवलतीचा पास काढण्याची मुभा.

महाराष्ट्र : दुर्धर आजारी, डायलेसिस आणि हिमोफेलिया रुग्ण, अपंग गुणवंत कामगार पुरस्कारप्राप्त व्यक्ती व त्यांचे साथीदार यासह विविध पुरस्कारप्राप्त खेळाडूंना विशिष्ट किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास. स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या एका साथीदाराला वर्षभर ४ ते ८ हजार किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात मासिक पास.

प्राथमिक, माध्यमिक तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत बससेवा दिली जाते. याशिवाय प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याकडे अधिक लक्ष दिले जाते. यामुळेच महामंडळ सक्षम आहे. - परशराम किरणगी, जनसंपर्क अधिकारी, वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळ, हुबळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक