शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

कोल्हापूर शहरात अनेक घरातून पूराचे पाणी; अडकलेल्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 15:11 IST

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या तुफान पावसामुळे रामानंदनगर, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभारगल्ली, मुक्त सैनिक वसाहत येथील अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने शहरवासियांची एकच तारांबळ उडाली. महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकांसह अग्निशमन दलांनी तात्काळ धाव घेऊन घरात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षीत ठिकाणी हलविले.

पंचगंगा नदीला पूर आल्यामुळे जयंती नाल्यातील पाणीच्या प्रवाह थांबला आहे. त्यातच रात्रभर कोसळणाऱ्या तुफान पावसाने कळंबा तलवा काठोकाठ भरला आणि त्यातील पाणी सांडव्यावरुन वेगाने बाहेर पडले. त्यामुळे रामानंदनगर पुलावर पाणी आले. तसेच रामानंद नगरातील शंभरहून अधिक घरात पाणी शिरले. पहाटेच्या वेळी अचानक पाण्याची पातळी वाढल्याने घरातील नागरीकांनी पहिल्या माळ्यावर धाव घेतली.

अग्निशमन दलाची पथके तेथे पोहचली, त्यांनी नागरीकांना घरातून बाहेर पडण्याचे आवाहन केले. पण नागरीकांनी घरातून बाहेर पडण्यास नकार दिला. दरम्यान त्याठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाची बोट घेऊन जाऊन नागरीकांना बाहेर पडण्याची विनंती केली. पाण्याची पातळी आणखी वाढण्याअगोदर बाहेर पडा अशी विनंती करताच नागरीकांनी बाहेर पडण्यास सहमती दिली. जवळपास पन्नास घरातील नागरीकांना बोटीतून बाहेर काढण्यात आले.

शहरातील शाहुपूरी कुंभार गल्ली, सहावी गल्ली परिसरातील बऱ्याच घरातून पाणी शिरले. नागरीकांनी स्वत:हून घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही कुटुंबांनी केलेल्या गणेश मूर्ती सुध्दा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. पुराच्या पाण्याने वेढल्यामुळे सहाव्या गल्लीतील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली. सुतारवाडा नागरी वस्तीत पाणी शिरले. तेथील सर्वच कुटुंबांना नजिकच्या चित्रदूर्ग मठात स्थलांतर करण्यात आले. मुक्त सैनिक वसाहत परिसरातही अनेक घरांच्या उंबऱ्यांपर्यं पाणी पोहचले आहे. रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्याठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.

शहरावर पुराचे संकट ओढवल्यामुळे महापालिका यंत्रणा सक्रिय झाली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उप मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, सहायक अधिकारी मनिष रणभिसे यांनी तात्काळ पूराचे पाणी शिरलेल्या नागरी वस्तींना भेटी दिल्या आणि नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस