शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी भरले, दूधगंगेतून पाणी सोडले; कोल्हापूरला पुराचा धोका

By राजाराम लोंढे | Updated: July 24, 2024 16:18 IST

कोल्हा पूर : कोल्हा पूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (४३ फूट) ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दिवसभर धुवांधार पाऊस कोसळत असून, पंचगंगा कोणत्याही क्षणी धोका पातळी (४३ फूट) ओलांडणार आहे. राधानगरी धरण ९५ टक्के भरल्याने स्वयंचलित दरवाजे खुले होणार असून, दूधगंगेतून पाणी सोडले आहे. वारणा धरणातूनही ८८७४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाणी विस्तीर्ण पसरले आहे. तब्बल ६३ मार्गांवरील वाहतूक थांबल्याने निम्मा जिल्हा ठप्प झाला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, पूरबाधीत गावातील नागरिकांना हलवण्यात आले आहे.जिल्ह्यात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी पावसाचा जोर वाढला आहे. एकसारख्या सरी कोसळत असून, धरणक्षेत्रात, तर अक्षरश: झोडपून काढले आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी खुले होण्याची शक्यता आहे. दूधगंगा धरण ७१ टक्के भरले असून, पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीज निर्मितीसाठी प्रतिसेकंद १६०० घनफूट पाणी दूधगंगेत येत आहे. वारणा धरणातून अगोदरच प्रतिसेकंद ३८०० घनफूट विसर्गात वाढ करून वक्र दरवाजातून ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्रमधून १६५८, असे एकूण ८८७४ घनफूटचा विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आल्याने पुराच्या पाण्यात वाढ झाली आहे.पडझडीत ४९.५९ लाखांचे नुकसानजिल्ह्यात एका सार्वजनिक मालमत्तेसह १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन तब्बल ४९ लाख ५९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.एसटीचे २० मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीचे २० मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.असे आहेत मार्ग बंद..राज्य मार्ग - १०प्रमुख जिल्हा मार्ग - २४इतर जिल्हा मार्ग - ७ग्रामीण मार्ग - २२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीfloodपूर