शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:52 IST

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला. पंचगंगेची पातळी कमी होऊन ४१ फूट ३ इंचांवर आली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने राधानगरी धरण ९२ टक्के भरून २२०० क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम होती. पंचगंगेची पातळी इंचइंचाने कमी होत असली तरी पसरलेले पाणी रस्त्यांवर असल्याने अद्याप राज्यमार्गांसह अन्य ३१ मार्ग बंद असून, ५५ बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. रविवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत १७९.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३१.५० मि.मी. पाऊस पडला. त्याखालोखाल आजरा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पावसाने रविवारी राधानगरी धरणामध्ये भर पडून ते ९२ टक्के भरले. येथून २२०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी रविवारी दिवसभरात इंचाइंचाने कमी झाली. यामध्ये शनिवारी (दि. २२) धोक्याच्या पातळीजवळ ४१ फूट ९ इंचांवर असलेली पंचगंगेची पातळी कमी होऊन ती रविवारी सायंकाळी सहापर्यंत ४१ फूट ३ इंचांवर आली. अद्याप पाणी धोक्याच्या पातळीजवळ असल्याने पूरस्थिती कायम आहे.एस.टी.चे २९ वाहतूक मार्ग बंदअतिवृष्टीने जिल्ह्यातील २९ मार्गांवरील एस. टी. बसची वाहतूक अंशत: तसेच पूर्णत: बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, गारगोटी-सावर्डे, गारगोटी-बाचणी, गारगोटी-केळेवाडी, गारगोटी-मालवाडी, मलकापूर-गावडी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रंकाळा, रंकाळा-बावेली, रंकाळा-कुंभवडे, रंकाळा-चौके, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-स्वयंभूवाडी, रंकाळा-गगनबावडा, रंकाळा-अणुस्कुरा, रंकाळा-गुडाळ, रंकाळा-भोगावती, रंकाळा-तारळे, इचलकरंजी-कागल, इचलकरंजी-बोरगाव, कागल-बस्तवडे, कागल-नंद्याळ, कागल-इचलकरंजी, राधानगरी-तारळे, राधानगरी-शिरगाव, गगनबावडा-कोल्हापूर, गगनबावडा-धुंदवडे या मार्गांवरील वाहतूक अंशत: व पूर्णत: बंद झाली आहे.पावणेपाच लाखांचे नुकसानकागल, भुदरगड, शाहूवाडी, करवीर, राधानगरी तालुक्यांत पावसामुळे पक्क्या व कच्च्या घरांसह जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन १९ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे ४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ४०८.२५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत १७९.०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ३१.५० मि.मी., राधानगरीमध्ये २०.३३ मि.मी., चंदगडमध्ये २३.८३ मि.मी., आजऱ्यात २६.५० मि.मी., कागलमध्ये ५.७१ मि.मी., शाहूवाडीत २३.३३ मि.मी., भुदरगडमध्ये १२.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये २.८७ मि.मी., शिरोळमध्ये १.८५ मि.मी., पन्हाळ्यात २४.५७ मि.मी., करवीरमध्ये ४.५४ मि.मी., गडहिंग्लज मध्ये २.०० मि.मी. पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील ३१ मार्ग बंदजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाच राज्यमार्गांसह नऊ प्रमुख जिल्हा, १२ इतर जिल्हा व पाच ग्रामीण असे ३१ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये चंदगड-इब्राहिमपूर-चितळे-शिगरवाडी-आजरा, कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-चंदगड, कोल्हापूर-चिखली-यवलूज-पुनाळ-बाजारभोगाव-करंजफेण, आदी प्रमुख राज्यमार्ग; शेणवडे-अणदूर-धुंदवडे-राशिवडे, येवती-बाचणी-साके-सावर्डे, आकनूर-खिंडी व्हरवडे-गुडाळ-तारळे-पडसाळी-गारिवडे, आदी प्रमुख जिल्हा मार्ग, शाहूवाडी-कोळगाव-टेकोली-पणुंद्रे, कुडित्रे-वाकरेपाटी-खुपिरे-शिंदेवाडी, कोल्हापूर-वाघाची तालीम उत्तरेश्वर पेठ-शिंगणापूर, आदी इतर जिल्हा मार्ग व शिरोळ-सोंडमोळी, आरे-सावरवाडी, म्हसवे-गारगोटी, इचलकरंजी-चंदूर-रुई, तिसंगी-टेकवाडी, आदी ग्रामीण मार्गांचा समावेश आहे.