शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

मानवतेचा पूर यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:00 AM

इंद्रजित देशमुख महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार ...

इंद्रजित देशमुखमहाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार आणि उद्ध्वस्त होणारी स्वप्नं बघून जीव अक्षरश: कातरला जातोय. या कातरण्यातच अनंत काहुरांची कधीच न संपणारी मालिका मनात विचारांचा डोंगर उभा करून जाते. पाऊस भयानक, पावसामुळे जीवनदायिनी असलेल्या नद्यांची दिसणारी रूपेही भयानक आणि या भयानक रूपातून निर्माण झालेला महापूरही भयानक आणि त्या भयानकतेमुळे जीवनात आलेलं केविलवाणेपण तर त्याहूनही भयानक, अशी आमची अवस्था झाली आहे. वास्तविक पाणी म्हणजे जीवन असतं ते आम्हाला जगवत असतं. पण आज हेच जगवणारं पाणी कितीतरी जणांचा जीवन संपवू पाहतंय. याचंच खूप वाईट वाटत आहे आणि मन खूप विषण्ण होत आहे. याच विषण्णतेत भर घालण्यासाठी म्हणून की काय कुठे कुठे महापुराच्या पाण्याबरोबर व्यापक न झालेली संकुचित मनंही पाहायला मिळत आहेत.वास्तविक जगातलं कुठलंही संकट इतकं गंभीर कधीच असू शकत नाही की जे आमचा धीर संपवेल; पण हा महापूर बघून आता मन खरोखरच घाबरायला लागलंय. भोवताली भग्न अवस्थेतील बांधकाम आणि विस्कटलेले संसार यामुळे होत्याचं न्हवतं झालेली कितीतरी चिन्हे आम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आता सगळंच गेलं. त्यामुळे जीवनातील नाउमेद वाढवणारी मनोवृत्ती तयार होत आहे, हे असं असलं तरी एखाद्या वावटळात दिवा लागावा त्याप्रमाणे आपलं स्वत:च तन-मन-धन अर्पण करून माणुसकीच्या महापुराचं दर्शन घडवणारं कुणी उभं राहतंय का आणि स्वत:सोबत इतरांनापूर काय येईल जाईलम्हणून का गळायचं।झटत झगडत जगूनाही गा पळायचं।परत उभं करू सारंमागं नाही वळायचं।धिटाई मनात धरूनाही चिंतेत जळायचं।हिंमतीनं ताकदीनं फुलवूसंसार आणि बांधू नवं घर।।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।जाईल महापूर दादा, नको सोडू धीर।।...असा धीर देत काही गोष्टीची मनं आतुरतेने वाट पाहत असत. तेवढ्यात आपल्या जवळचे दीदी आणि दादा पूर आणि पाण्यात उभं राहून इतरांचे संसार उभे करण्यासाठी धडपडत असल्याचं कळलं की डोळे आपोआप भरून येतात आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक भाव वाढीस लागतो. संपत्तीसंचयाच्या पलीकडे सुद्धा एक देखणं विश्व आहे आणि तेच विश्व या जगातील अंतिम सत्य आहे, याची आपोआप प्रचिती या लोकांचं काम बघून जाणवते.जीवनात संकटं तर येतच असतात, पण अशा संकटातसुद्धा एखादी संधी लपलेली असते आणि त्या संधीला शोधून तिचं सौंदर्यात परिवर्तन करायचं असतं; हे आम्हाला अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच कळतं म्हणूनच परत परत अशा आपत्तीग्रस्तांना मदत करू वाटते. मग ती कोणत्याही प्रकारे असुदे. त्यांना आपल्याकडून देता आलं तर धन द्यावं नाही जमलं तर मन द्यावं आणि तेही नाही जमलं तर निदान तन तरी द्यावं. धनाच्या बाबतीत कुणी चलन द्यावं म्हणजे आपत्तीग्रस्तांना सुसह्य स्थितीत जगता येईल. ज्यांना चलन जमणार नाही त्यांनी या आपत्तीग्रस्तांची मनोभावे सेवा करावी आणि ज्यांना सेवाही जमत नाही त्यांनी निदान माझ्या एका कवी मित्रानं म्हटल्याप्रमाणेआलेल्या या संकटात एकेजागी ºहाऊ।मिळालेला घास, तुकडा सांभाळून खाऊ।बुडवणारा पूर सगळे एकोप्याने पोहू।धिटाईने महापुरा ओसराया लावू।संकटात परसंगाला, तुला मी आधार आणिमला तू आधार।जाईल महापूर दादा, जाईल महापूर।।असा निदान शब्दाचा आधार तरी द्यावा आणि तो मनापासून द्यावा. ही सगळी मदतीचीच रूपे आहेत. आपण ती अवलंबली तर आपल्यालाही समाधान लाभतं. कधीतरी आमच्या मनाला प्रश्न पडतो की हे आम्ही का करायचं तर त्याचं उत्तर एकच आहे की तर ते मानव्याच्या जोपासनेसाठी करायचं. एक तेजस्वी दिवा आपल्यासारखे हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो आणि जगातील अंधार कमी होऊ शकतो; त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत राहून अवघ्यांच्या जीवनातील अपूर्णांचा अंध:कार कमी करण्यासाठी हे करायचं. वास्तविक नदी गावात येत असताना गटारीचं आणि ओढ्याचं पाणी ज्या सहजतेने आपल्या प्रवाहात स्वीकारते; त्याच भावाने मंदिरातील मोरीतून येणारं तीर्थसुद्धा ती स्वीकारते. आमच्या जगण्यातसुद्धा ही सहजता यावी. आम्ही अशा या आपत्तीग्रस्तांसाठी खूप खूप मदत करावी आणि आमच्या प्रत्येकाच्या अंत:करणात मानवतेचा महापूर यावा आणि तो कधीही न ओसरणारा असावा, एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक वपरिवर्तनशील वक्ते आहेत)