शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

Warkari accident near Sangola: एकाच चितेवर पाच जणांचे अंत्यसंस्कार; जठारवाडी शोकमग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:08 IST

आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.

पोपट पवारकोल्हापूर : एरव्ही टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला की उभा गाव त्यात तल्लीन व्हायचा, लहान थोरासह  सगळ्यांचीच पावले गावचे शक्तीपीठ असलेल्या विठ्ठल मंदिराकडे आपसूकच वळायची. आज मंगळवारीही टाळ मृदुंगचा गजर उभ्या शिये-जठारवाडी परिसरात घुमला खरा, मात्र, या आवाजाला अश्रूंची किनार होती. आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.   जुनोनी(ता.सांगोला) या गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील पाच जणांचा तर वळीवडे येथील दोघा मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव मंगळवारी पहाटे जठारवाडी गावात पोहोचले. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत पाचही जणांचे पार्थिव ठेवत टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.  यातील जठारवाडी येथील ४ महिला व एक पुरुष अशा पाच जणांवर मंगळवारी सकाळी आठ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच ठिकाणी रचण्यात आलेल्या चितेवर पाचही जणांचे अंत्यसंस्कार होताना उभा गाव अश्रूंनी डबडबला होता.जठारवाडी येथील ३५ जणांची दिंडी आठ दिवसांपूर्वी गावातून पंढरपूरकडे रवाना झाली. ही दिंडी  सोमवारी सायंकाळी जुनोनी गावाजवळून जात असताना अचानक पाठीमागून आलेली कार या दिंडीत घुसली. यात सात जण ठार झाले. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. शारदा आनंदा घोडके (वय ६१), रंजना बळवंत जाधव (५५), सुनिता पवार, गौरव पवार (१४), सर्जेराव श्रीपती जाधव (५२), सुनीता सुभाष काटे (५०), शांताबाई शिवाजी जाधव (६२) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी सुनिता पवार आणि गौरव पवार हे मायलेक असून ते जठारवाडी इथले पाहुणे आहेत. ते मूळचे वळीवडे गावचे रहिवासी आहेत.                विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल, सोमवारी सायंकाळी कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांनी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातSolapurसोलापूर