शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

पाच वर्षांत जिल्ह्यात पाचशे बालगुन्हेगारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:53 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोरी, मारामारी, चैनीसाठी पाकीटमारी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वर्षागणीक बालगुन्हेगारीचे प्रमाण ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चोरी, मारामारी, चैनीसाठी पाकीटमारी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वर्षागणीक बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बाल न्याय मंडळाकडे २०१४ ते १८ या पाच वर्षांत अशी जिल्ह्यातील ५०० हून अधिक प्रकरणे दाखल झाली आहेत. कायद्याने बालगुन्हेगारांना शिक्षाच होत नसल्याने ‘कोणताही गुन्हा केला तरी चालतो,’ या मानसिकतेतून गुन्हेगारी टोळी, कुटुंबातील माणसांकडून गुन्ह्यांसाठी लहान मुलांचा वापर केला जातो.एक गुन्हा पचला की मुलांमध्ये धाडस येते आणि ती गुन्हेगारी मार्गाला लागतात. दुसरीकडे पालकांकडून चैनीसाठी पैसे मिळत नाहीत म्हणूनही गुन्हे करणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यात मुलींचेही प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. वय वर्षे १४ ते १६ या वयोगटातील मुलांवर चोरी, मारामारी, विनयभंग, बलात्कार, चैनीसाठी मोबाईल, वाहनचोरी, पाकीटमारी, खून-खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत.पोलिसांकडून अशी प्रकरणे बाल न्याय मंडळाकडे येते. गुन्हा किरकोळ असेल तर समुपदेशन, पालकांच्या जामिनावर सोडले जाते; पण तो गंभीर असेल तर त्या मुलाची बालनिरीक्षणगृहात रवानगी जाते. सध्या निरीक्षणगृहात अशी १६ ते २० मुले आहेत. जी मुले चुकून किंवा परिस्थितीने गुन्ह्यात अडकतात ती सुधारतात; पण जी मुले मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमीतील असतात ती सुधारत नाहीत, असा अनुभव आहे.तीनशे प्रकरणे प्रलंबितमुलं पळून जाणे, समन्स लागू न होणे, साक्षीदार नसणे, मुले सज्ञान होणे, पालक हजर नसणे अशा कारणांमुळे वर्षानुवर्षे खटले सुरूच राहतात. बाल न्याय मंडळाकडून आठवड्यातून दोन दिवस न्यायालय चालविले जाते. हा वेळ कायदेशीर प्रक्रियेत निघून जातो. येणारी प्रकरणे आणि मिळणारा वेळ यांत व्यस्त प्रमाण आहे. परिणामी बाल न्याय मंडळाकडे जवळपास ३०० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांत पूर्णवेळ न्यायालय व्हावे, अशी मागणी आहे.पाठपुराव्याचा अभावबालगुन्हेगारांचे पुढे काय होते, याचा पाठपुरावा करणारी सक्षम यंत्रणा शासनाकडे नाही. निरीक्षणगृहानंतर ती कोणत्या वातावरणात जातात, पालकांकडे सुरक्षित आहेत का, त्यांच्या पुनर्वसनासाठी काही सोईसुविधा देता येईल का, याबाबत निर्णय घेऊन काम करणारी यंत्रणा नसल्याने अशा मुलांचे पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच येते.