शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

आधी खात्यावर रक्कम वर्ग करा, मगच उठतो! भारत पाटणकर: चांदोली अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:12 IST

आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही.

ठळक मुद्देचांदोली अभयारण्यग्रस्तांनी शासनाने थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. २७) पासून रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.सात गावांना ही रक्कम तातडीने मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ठरविले असल्याचे सांगितले.

कोल्हापूर : आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही. सात गावांतील एक हजार खातेदारांच्या खात्यावर संपूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय उठायचे नाही, असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी केला. वन विभागाने ३० लाखांची रक्कम ५७ खातेदारांच्या खात्यावर वर्ग केली. उर्वरित रक्कम येत्या चार दिवसांत वर्ग करू, असे सांगितले, तरीही ठिय्या आंदोलनावर आंदोलक ठाम राहिले.

चांदोली अभयारण्यग्रस्तांनी शासनाने थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. २७) पासून रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुपारी भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलन थांबवू नका, असे त्यांनी आवाहन केले. दरम्यान, बुधवारी सकाळीच सहायक वनसंरक्षक एस. एम. मुल्ला यांनी आंदोलकांची भेट घेऊन रक्कम वर्ग करू; फक्त बॅँकिंग व्यवस्थेवर ताण येत आहे. तरीदेखील सर्वांच्याच खात्यावर ती लवकरच जमा होईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; पण आंदोलकांनी ती फेटाळून लावली. या संदर्भात बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे मारुती पाटील यांनीही अभयारण्यग्रस्त असलेल्या सात गावांना ही रक्कम तातडीने मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ठरविले असल्याचे सांगितले.सात गावांतील संसार वनविभागाच्या दाराततानाळी, सोनार्ली, निवळे, चांदेल, टाकाळे, पुलाची वाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे हे एक गाव अशा एकूण सात गावांतील अभयारण्यग्रस्त आपल्या बायाबापड्यांसह वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. घरदार सोडून लहान मुले, वृद्धांसह त्यांनी आपला संसारच रस्त्याकडेला वसविला आहे.चार दिवसांत रक्कम खात्यावर वर्ग होईल :एस. एम. मुल्ला, सहायक वनसंरक्षक, वन विभाग, कोल्हापूरअभयारण्यग्रस्तांच्या खात्यांवर ४ कोटी २२ लाखांची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. ती टप्प्याटप्प्याने येत्या चार दिवसांत वर्ग होईल. त्यांपैकी पहिला ३० लाखांचा हप्ता बुधवारी बँकेकडे पाठविण्यात आला. आज, गुरुवारी आणखी ५० लाख पाठविले जाणार आहेत. मोठी रक्कम असल्याने युनियन बँकेकडून यासाठी थोडा वेळ मागण्यात आला आहे. तरीदेखील ती लवकरात लवकर जाईल, अशी व्यवस्था केली आहे.आमच्या भाळी संघर्षाचंच जिणं... जवळपास ७५ किलोमीटरचे अंतर पार करून चांदोली अभयारण्यातील बायाबापड्यांनी कोल्हापुरातील रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. व्यवस्थेकडून वर्षानुवर्षांचे नाकारलेपण आणि कपाळावर संघर्षाचे निशाण घेऊन जगत असलेल्या या वृद्ध महिलांच्या आयुष्याच्या उतरणीलाही संघर्षच वाट्याला आला आहे.--फोटो नसीर अत्तार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणMONEYपैसा