शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

आधी खात्यावर रक्कम वर्ग करा, मगच उठतो! भारत पाटणकर: चांदोली अभयारण्यग्रस्तांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 11:12 IST

आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही.

ठळक मुद्देचांदोली अभयारण्यग्रस्तांनी शासनाने थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. २७) पासून रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.सात गावांना ही रक्कम तातडीने मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ठरविले असल्याचे सांगितले.

कोल्हापूर : आतापर्यंत शासनाने फसवलेच आहे. आता उठा म्हणतील, पैसे जमा करतो म्हणतील; पण गेल्यावर पुन्हा शांत बसतील. आतापर्यंतचा सरकारी यंत्रणेचा वाईट अनुभव आहे. आम्ही आता फसणार नाही. सात गावांतील एक हजार खातेदारांच्या खात्यावर संपूर्ण रक्कम जमा झाल्याशिवाय उठायचे नाही, असा निर्धार श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी केला. वन विभागाने ३० लाखांची रक्कम ५७ खातेदारांच्या खात्यावर वर्ग केली. उर्वरित रक्कम येत्या चार दिवसांत वर्ग करू, असे सांगितले, तरीही ठिय्या आंदोलनावर आंदोलक ठाम राहिले.

चांदोली अभयारण्यग्रस्तांनी शासनाने थकीत देणी देण्याच्या मागणीसाठी मंगळवार (दि. २७) पासून रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी दुपारी भारत पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलन थांबवू नका, असे त्यांनी आवाहन केले. दरम्यान, बुधवारी सकाळीच सहायक वनसंरक्षक एस. एम. मुल्ला यांनी आंदोलकांची भेट घेऊन रक्कम वर्ग करू; फक्त बॅँकिंग व्यवस्थेवर ताण येत आहे. तरीदेखील सर्वांच्याच खात्यावर ती लवकरच जमा होईल, असे सांगत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; पण आंदोलकांनी ती फेटाळून लावली. या संदर्भात बोलताना श्रमिक मुक्ती दलाचे मारुती पाटील यांनीही अभयारण्यग्रस्त असलेल्या सात गावांना ही रक्कम तातडीने मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ठरविले असल्याचे सांगितले.सात गावांतील संसार वनविभागाच्या दाराततानाळी, सोनार्ली, निवळे, चांदेल, टाकाळे, पुलाची वाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील सहा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे हे एक गाव अशा एकूण सात गावांतील अभयारण्यग्रस्त आपल्या बायाबापड्यांसह वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बसले आहेत. घरदार सोडून लहान मुले, वृद्धांसह त्यांनी आपला संसारच रस्त्याकडेला वसविला आहे.चार दिवसांत रक्कम खात्यावर वर्ग होईल :एस. एम. मुल्ला, सहायक वनसंरक्षक, वन विभाग, कोल्हापूरअभयारण्यग्रस्तांच्या खात्यांवर ४ कोटी २२ लाखांची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. ती टप्प्याटप्प्याने येत्या चार दिवसांत वर्ग होईल. त्यांपैकी पहिला ३० लाखांचा हप्ता बुधवारी बँकेकडे पाठविण्यात आला. आज, गुरुवारी आणखी ५० लाख पाठविले जाणार आहेत. मोठी रक्कम असल्याने युनियन बँकेकडून यासाठी थोडा वेळ मागण्यात आला आहे. तरीदेखील ती लवकरात लवकर जाईल, अशी व्यवस्था केली आहे.आमच्या भाळी संघर्षाचंच जिणं... जवळपास ७५ किलोमीटरचे अंतर पार करून चांदोली अभयारण्यातील बायाबापड्यांनी कोल्हापुरातील रमणमळ्यातील वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. व्यवस्थेकडून वर्षानुवर्षांचे नाकारलेपण आणि कपाळावर संघर्षाचे निशाण घेऊन जगत असलेल्या या वृद्ध महिलांच्या आयुष्याच्या उतरणीलाही संघर्षच वाट्याला आला आहे.--फोटो नसीर अत्तार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणMONEYपैसा