शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

साखर कामगारांवरच पहिली कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:03 IST

साखर कारखाने दिवसेंदिवस साखरेचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत; पण संघटित असणारी साखर कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनत चालल्याने

ठळक मुद्देबँका, पतसंस्थांची कर्जे थकली : कारखान्यांचे एक ते दहा महिन्यांचे पगार नाहीत

कोपार्डे : साखर कारखाने दिवसेंदिवस साखरेचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत; पण संघटित असणारी साखर कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनत चालल्याने जिल्ह्यातील आठ ते दहा कारखान्यांचे एक ते दहा महिन्यांचे पगार थकले आहेत, तर काही कारखान्यांचे पगार महिन्याची पंधरा तारीख उलटली तरी होताना दिसत नाहीत. त्यामुळे साखर कामगारांवर कारखानदारांनी आता पहिली कुºहाड चालवायला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

साखर कारखानदारी हा हंगामी उद्योग आहे. यात काम करणारा ६० टक्के कर्मचारी हा एक तर अकुशल असतोच त्याशिवाय त्याला मिळणारा रोजगार हा चार ते जास्तीत जास्त सहा महिने असतो. बाकी सहा ते आठ महिने साखर उद्योगातील कर्मचाऱ्याला बेकार राहावे लागते. बेकारीच्या काळात काही कारखाने बेकार भत्ता देतात; पण काही कारखाने तोही देत नसल्याने कर्मचाºयांना सहा महिने आपल्या उदरनिर्वाहासाठी अन्य साधनांवर अवलंबून राहावे लागते.

त्यातच अलीकडे बºयाचवेळा नैसर्गिक आपत्तीचा परिणाम ऊस उत्पादनावर होत असल्याने कधी अधिक, तर कधी कमी साखर व ऊस उत्पादनाचा फटका सर्व प्रथम कर्मचाºयांनाच सोसावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.साखरेचे दर पडल्याने उत्पादन खर्चाएवढाही साखरेला दर मिळत नाही; पण आता एफआरपीबाबत शेतकºयांच्यात संघटन झाले असून, याला कायद्याची जोड देत आपल्या हक्काचे दाम मिळविण्यासाठी शेतकºयांना यश येत आहे. नेमकी याच्या उलटी परिस्थिती साखर कामगारांची झाली आहे. कामगार संघटनांचा सन २००४ पूर्वी असलेला धाक हळूहळू कमी होऊ लागला आहे.

कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे कामगारांच्या मासिक वेतनावर गंडांतर आले असून, जिल्ह्यातील आठ ते दहा कारखान्यांतील साखर कामगारांचे पगार थकले आहेत. एवढेच नाही तर प्रॉव्हिडंड फंड, हक्काच्या रजांवर गंडांतर आणले जात असून, बिगर हंगाम काळातील बेकार भत्ता ही थकवला जात आहे. याचा परिणाम कामगारांनी पगार तारणावर बँका, पतसंस्था, कामगार सोसायटीची काढलेली कर्जे थकू लागली आहेत.अनावश्यक नोकरभरतीकाही कारखानदारांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अनावश्यक नोकर भरती केली आहे. यामुळे प्रक्रिया खर्च प्रतिटन एक हजार ते १५०० रुपयांंवर पोहचला आहे. याचा परिणाम कारखान्यांची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे.

१९६० नंतर महाराष्ट्रात साखर कारखानदारीचा उदय झाला. या साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य तंतोतंत खरे ठरवण्यासाठी या उद्योगातील कामगारांनी आपले श्रम व बुद्धी यांच्या जोरावर या उद्योगाला सुवर्ण युग आणले. मात्र, तोच घटक आज उपेक्षित आहे. 

साखर कामगारांनी कॉ. संतराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करून साखर कामगारांना विविध हक्क मिळवून दिला. मात्र, कारखानदार व त्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या संघटना यांनी ते नाकारण्यास सुरुवात केली आहे. आता तर दहा-दहा महिन्यांचे पगार थकले आहेत. यापुढे कामगारांनी जागृत राहून हक्क अबाधित राखण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.- राम चौगले, साखर कामगार भोगावती

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर