शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांवरच पहिली कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:03 IST

साखर कारखाने दिवसेंदिवस साखरेचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत; पण संघटित असणारी साखर कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनत चालल्याने

ठळक मुद्देबँका, पतसंस्थांची कर्जे थकली : कारखान्यांचे एक ते दहा महिन्यांचे पगार नाहीत

कोपार्डे : साखर कारखाने दिवसेंदिवस साखरेचे दर गडगडल्याने आर्थिक अडचणीत सापडत आहेत; पण संघटित असणारी साखर कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनत चालल्याने जिल्ह्यातील आठ ते दहा कारखान्यांचे एक ते दहा महिन्यांचे पगार थकले आहेत, तर काही कारखान्यांचे पगार महिन्याची पंधरा तारीख उलटली तरी होताना दिसत नाहीत. त्यामुळे साखर कामगारांवर कारखानदारांनी आता पहिली कुºहाड चालवायला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

साखर कारखानदारी हा हंगामी उद्योग आहे. यात काम करणारा ६० टक्के कर्मचारी हा एक तर अकुशल असतोच त्याशिवाय त्याला मिळणारा रोजगार हा चार ते जास्तीत जास्त सहा महिने असतो. बाकी सहा ते आठ महिने साखर उद्योगातील कर्मचाऱ्याला बेकार राहावे लागते. बेकारीच्या काळात काही कारखाने बेकार भत्ता देतात; पण काही कारखाने तोही देत नसल्याने कर्मचाºयांना सहा महिने आपल्या उदरनिर्वाहासाठी अन्य साधनांवर अवलंबून राहावे लागते.

त्यातच अलीकडे बºयाचवेळा नैसर्गिक आपत्तीचा परिणाम ऊस उत्पादनावर होत असल्याने कधी अधिक, तर कधी कमी साखर व ऊस उत्पादनाचा फटका सर्व प्रथम कर्मचाºयांनाच सोसावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.साखरेचे दर पडल्याने उत्पादन खर्चाएवढाही साखरेला दर मिळत नाही; पण आता एफआरपीबाबत शेतकºयांच्यात संघटन झाले असून, याला कायद्याची जोड देत आपल्या हक्काचे दाम मिळविण्यासाठी शेतकºयांना यश येत आहे. नेमकी याच्या उलटी परिस्थिती साखर कामगारांची झाली आहे. कामगार संघटनांचा सन २००४ पूर्वी असलेला धाक हळूहळू कमी होऊ लागला आहे.

कामगार संघटना कारखानदारांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे कामगारांच्या मासिक वेतनावर गंडांतर आले असून, जिल्ह्यातील आठ ते दहा कारखान्यांतील साखर कामगारांचे पगार थकले आहेत. एवढेच नाही तर प्रॉव्हिडंड फंड, हक्काच्या रजांवर गंडांतर आणले जात असून, बिगर हंगाम काळातील बेकार भत्ता ही थकवला जात आहे. याचा परिणाम कामगारांनी पगार तारणावर बँका, पतसंस्था, कामगार सोसायटीची काढलेली कर्जे थकू लागली आहेत.अनावश्यक नोकरभरतीकाही कारखानदारांनी आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अनावश्यक नोकर भरती केली आहे. यामुळे प्रक्रिया खर्च प्रतिटन एक हजार ते १५०० रुपयांंवर पोहचला आहे. याचा परिणाम कारखान्यांची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आहे.

१९६० नंतर महाराष्ट्रात साखर कारखानदारीचा उदय झाला. या साखर कारखानदारीमुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली. ‘विना सहकार नाही उद्धार’ हे ब्रीदवाक्य तंतोतंत खरे ठरवण्यासाठी या उद्योगातील कामगारांनी आपले श्रम व बुद्धी यांच्या जोरावर या उद्योगाला सुवर्ण युग आणले. मात्र, तोच घटक आज उपेक्षित आहे. 

साखर कामगारांनी कॉ. संतराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करून साखर कामगारांना विविध हक्क मिळवून दिला. मात्र, कारखानदार व त्यांच्या हातचे बाहुले बनलेल्या संघटना यांनी ते नाकारण्यास सुरुवात केली आहे. आता तर दहा-दहा महिन्यांचे पगार थकले आहेत. यापुढे कामगारांनी जागृत राहून हक्क अबाधित राखण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.- राम चौगले, साखर कामगार भोगावती

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर