शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
4
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
5
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
6
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
7
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
10
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
11
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
12
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
13
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
14
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
15
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
16
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
17
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
18
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
19
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
20
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं

कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:43 IST

आगीत तीन सिलेंडरचा स्फोट

कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत मशिनरी विभागातील काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. शॉर्टसर्किटने ही आग लागली. घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक तळ ठोकून होते. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली होती.सकाळी साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला ही आग कर्मचाऱ्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती. काही वेळातच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग लागल्यानंतर थोड्याच वेळात तीन सिलिंडरचा एका पाठोपाठ स्फोट झाल्याने आगीचा भडका सर्वत्र मोठ्या प्रमाणात उडाला. काही क्षणातच आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. दोनच दिवसापूर्वी राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.गळीत हंगाम संपल्याने कारखान्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कारखान्यात अनेक ठिकाणी बगॅस पडले होते. मोठ्या प्रमाणात सर्वत्र ऑइलही सांडले होते. काही ठिकाणी वेल्डिंगच्या साहाय्याने मशिनरी कट करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट झाले व जमिनीवर पडलेल्या ऑइल व बगॅसने पेट घेतला. मोठ्या प्रमाणात वायरिंगही जळू लागले. कोल्हापूर महापालिका अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह वडगाव तसेच परिसरातील चार टँकर आग विझवण्यासाठी कार्यरत होते. शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिक्के, प्र. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

कारखान्यात काही मशीनचे पार्ट कट करण्याचे काम वेल्डिंगच्या साहाय्याने सुरू होते. अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. - आमदार अमल महाडिक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेfireआग