शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

दोष पुरुषाचा, परंतु मानसिक छळ मात्र बाईचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST

कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ ...

कोल्हापूर : मूल होण्यात बाई एकटीच जबाबदार नसते. त्यामध्ये पुरुषाचाही तितकाच दोष असतो; परंतु समाज मात्र बाईचा मानसिक छळ करत असल्याचे वास्तव आहे. तुला अजून दिवस गेले नाहीत का, म्हणून सासरी व माहेरीही तिचीच परीक्षा घेतली जाते. पुरुषाला असे कोण कधी विचारात नाही. मूल होण्यात पुरुषाची जबाबदारी जास्त असल्याचे वैद्यकीय कारण कोल्हापुरातील प्रसूतीतज्ज्ञ डॉ. मंजुळा पिशवीकर यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.

सोनाळी (ता.कागल) येथील सात वर्षाच्या मुलाचे अपहरण करून खून करण्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यातील संशयित आरोपीस लग्नाला पंधरा वर्षे झाली तरी मूल झाले नव्हते, असे पुढे आले आहे. मुलाच्या खुनाच्या कारणांशी हे कारण जोडले आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने मूल न होण्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेतले.

१.मूल होण्यासाठी पती व पत्नीचा वाटा समान ५० टक्के असतो. किंबहुना पुरुषाची जबाबदारी मूल होण्यात जास्त असते. कारण त्याच्या शरीरात पुुरेशा शुक्राणुंची निर्मिती न झाल्यास मूल होण्यात अडचणी येतात.

२.मूल होत नाही म्हटल्यावर आता सर्व दोष पत्नी नावाच्या बाईला दिला जातो. लग्न झाल्यावर वर्षभरानंतर दिवस गेले नाहीत तर त्याबद्दलचा जाब हा पुरुषाला कधीच विचारला जात नाही. तो बाईलाच विचारला जातो.

३. पत्नीच्या शुक्राणुंची तपासणी करण्यासाठी किमान २० हजारांहून जास्त खर्च येतो. त्यासाठी छोटी शस्त्रक्रियाही करावी लागते. याउलट पुरुषाची शुक्रजंतू सुलभ असते. त्यामुळे पुरुषाची तपासणी करणे अधिक गरजेचे असते. त्याच्या शरीरात शुक्रजंतू निर्मितीस अडचणी असतील तर मूल होण्यास विलंब होतो.

४.पुरुषांमध्ये मोबाइलचा वाढता वापर, धूम्रपान, सतत ताणतणाव यामुळे शुक्रजंतू तयार होण्यात अडचणी येतात. तयार झाले तरी ते प्रजननयोग्य नसतात. त्यामुळे गर्भधारणा होत नाही.

५.महिलांमध्ये एक्स एक्स असे जिन्स असतात व पुरुषांमध्ये एक्सवाय असे जिन्स असतात. पुरुष व महिलेतील एक्स-एक्स जिन्स एकत्र आले तर मुलगी जन्माला येते व महिलेतील एक्स व पुरुषांतील वाय जिन्सचे मिलन झाल्यानंतर मुलगा जन्माला येतो. म्हणजे येथेही जन्माला येणारे अपत्य मुलगा की मुलगी होणार, हे सुद्धा पुरुषाच्या जिन्सवर ठरते; परंतु मुलगी झाली म्हणून समाज मात्र बाईचाच छळ करतो, करत आला आहे.

-------------

अनेक घरात हुंदके...

सोनाळीतील वरद पाटील या मुलाचा खून झाल्याचे वृत्त शुक्रवारी दुपारी सोशल मीडियावरून व्हायरल होताच कित्येकांना त्याचा मानसिक धक्का बसला. अनेक महिलांना अक्षरश: रडू कोसळले. कारण काहीही असले तरी या अत्यंत गोंडस बाळाने तुझे काय वाईट केले होते रे निर्दयी राक्षसा, अशी संतप्त भावना समाजातून व्यक्त झाली.