शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुर्देवी घटना! आजऱ्यात मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:19 IST

सकाळपासूनच लग्नाची धांदल सुरु असतानाच माणगावकर कुटुंबावर काळाने घाला घातला.

आजरा : मुलीच्या लग्नादिवशीच वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आजऱ्यात घडली. प्रा. हसनसाब अब्दुल माणगावकर असे या मृत वडिलांचे नाव आहे. माणगावकर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हसनसाब माणगावकर हे आजरा महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक होते.सकाळपासूनच लग्नकार्याची धावपळ सुरु असतानाच ही घटना घडल्याने उपस्थित नातेवाईकांना धक्काच बसला. विवाहासाठी आलेल्या नातेवाईक व मित्र परिवाराला त्यांच्यावर अंत्यसंस्काराची करण्याची दुर्देवी  वेळ आली.प्रा. हसनसाब माणगावकर यांच्या अल्फिया या मुलगीचा आज विवाह होता. सकाळपासूनच सर्वांची धावपळ सुरू होती. त्यातच सरांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना उपचारासाठी आजरा व गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी व कुटुंबीयांवर एकच शोककळा पसरली. 

एक निगर्वी व कायम हसतमुख चेहरा असणाऱ्या सरांच्या निधनामुळे सर्व धर्मीयांमध्ये शोककळा पसरली. हिंदू-मुस्लीम समाजाला एकत्र करून दोन्ही समाजात एकोपा घडवून आणणारे प्रा. हसनसाब समाज प्रिय शिक्षक होते. सुंदर हस्ताक्षर व उत्कृष्ट फलक लेखनामुळे ते विद्यार्थी प्रिय होते.  इंग्रजी विषयात एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेल्या लाडक्या अल्फियाचे थाटात लग्न करण्याचा सरांचा मनोदय होता. पण लग्नापूर्वीच सरांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे व दोन मुली भाऊ असा परिवार आहे... सर बाबा को बुलाव..प्रा. हसन माणगावकर यांचा पार्थिव आजऱ्यातील घरी आणल्यानंतर सर्व शिक्षक व विद्यार्थी अंत्यदर्शन घेण्यासाठी घरी गेले. सर्वांना पाहून लाडकी अल्फिया हिने एकच हंबरडा फोडला व " सर बाबा को बुलाव " अशी आर्त हाक दिली. त्यावेळी सर्वांनाच हुंदका आवरता आला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर