शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

ओल्या दुष्काळाचे सावट आतापर्यंत १५ हजार मिलिमीटर पाऊस : पिके आकसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:33 IST

पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला.

कोल्हापूर : पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. सततच्या पावसाने खरीप पिके आकसली असून जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.

आपल्याकडे मान्सूनच्या चार महिन्यांत १५ दिवस जोरदार पाऊस, त्यानंतर आठ - दहा दिवस उघडझाप अशीच परिस्थिती राहते. जुलै महिन्यात पावसाचा जोर राहतो, त्यानंतर हळूहळू जोर कमी येतो. श्रावण महिन्यात तर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो. अशा प्रकारचा पाऊस पिकांना पोषक असतो. पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यंदा जिल्ह्णात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस एकसारखा सुरू आहे. ‘मृग’ नक्षत्रापासून पाऊस झोडपत असून, पुढचे नक्षत्र उघडेल, त्या पुढच्या नक्षत्रात पाऊस कमी होईल, अशी अटकळ शेतकºयांनी बांधली; पण अडीच महिने पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही. त्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जमिनीत वापसाच नसल्याने वाढ खुंटली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यात तर अतिवृष्टीमुळे उसाच्या पानांच्या चिंध्या उडाल्या आहेत. सूर्यप्रकाश नाही, त्यात पाने फाटल्याने अन्न निर्मितीच थांबल्याने ऊस खाली बसले आहेत.

गेल्यावर्षी १७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्णात ९ हजार ९३७ मिलिमीटर पाऊस झाला होता, या वर्षी १५ हजार २१५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ५ हजार २७८ मिलिमीटर जादा पाऊस झाला आहे. अडीच महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला. नदीकाठावरील ऊस पाण्याखाली गेल्याने ते संपले आहेत. उर्वरित ठिकाणी अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावाने ऊस, भातासह इतर पिके अडचणीत आली आहेत; त्यामुळे जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे संकट पसरले असून, असाच पाऊस आणखी १५ दिवस राहिला, तर दुष्काळाचे संकट अधिक गडद होणार, हे मात्र निश्चित आहे.

तीन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडलीशाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी १७ आॅगस्टपर्यंत एकाही तालुक्याने सरासरी ओलांडली नव्हती.माणसाबरोबर जनावरेही कैंगाटलीएकसारख्या पावसाने माणसे वैतागून गेले आहेत; पण त्याबरोबर जनावरेही आता कैंगाटली आहेत. पावसामुळे अंगातील गारठा जात नसल्याने दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे.सव्वादोन कोटींचे नुकसानगेल्या वर्षी आतापर्यंत १९७ मालमत्तांची पडझड होऊन ४० लाख १७ हजारांचे नुकसान झाले होते; पण यंदा तब्बल २ कोटी ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.