शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ओल्या दुष्काळाचे सावट आतापर्यंत १५ हजार मिलिमीटर पाऊस : पिके आकसल्याने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:33 IST

पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला.

कोल्हापूर : पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. सततच्या पावसाने खरीप पिके आकसली असून जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.

आपल्याकडे मान्सूनच्या चार महिन्यांत १५ दिवस जोरदार पाऊस, त्यानंतर आठ - दहा दिवस उघडझाप अशीच परिस्थिती राहते. जुलै महिन्यात पावसाचा जोर राहतो, त्यानंतर हळूहळू जोर कमी येतो. श्रावण महिन्यात तर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो. अशा प्रकारचा पाऊस पिकांना पोषक असतो. पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यंदा जिल्ह्णात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस एकसारखा सुरू आहे. ‘मृग’ नक्षत्रापासून पाऊस झोडपत असून, पुढचे नक्षत्र उघडेल, त्या पुढच्या नक्षत्रात पाऊस कमी होईल, अशी अटकळ शेतकºयांनी बांधली; पण अडीच महिने पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही. त्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जमिनीत वापसाच नसल्याने वाढ खुंटली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यात तर अतिवृष्टीमुळे उसाच्या पानांच्या चिंध्या उडाल्या आहेत. सूर्यप्रकाश नाही, त्यात पाने फाटल्याने अन्न निर्मितीच थांबल्याने ऊस खाली बसले आहेत.

गेल्यावर्षी १७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्णात ९ हजार ९३७ मिलिमीटर पाऊस झाला होता, या वर्षी १५ हजार २१५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ५ हजार २७८ मिलिमीटर जादा पाऊस झाला आहे. अडीच महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला. नदीकाठावरील ऊस पाण्याखाली गेल्याने ते संपले आहेत. उर्वरित ठिकाणी अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावाने ऊस, भातासह इतर पिके अडचणीत आली आहेत; त्यामुळे जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे संकट पसरले असून, असाच पाऊस आणखी १५ दिवस राहिला, तर दुष्काळाचे संकट अधिक गडद होणार, हे मात्र निश्चित आहे.

तीन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडलीशाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी १७ आॅगस्टपर्यंत एकाही तालुक्याने सरासरी ओलांडली नव्हती.माणसाबरोबर जनावरेही कैंगाटलीएकसारख्या पावसाने माणसे वैतागून गेले आहेत; पण त्याबरोबर जनावरेही आता कैंगाटली आहेत. पावसामुळे अंगातील गारठा जात नसल्याने दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे.सव्वादोन कोटींचे नुकसानगेल्या वर्षी आतापर्यंत १९७ मालमत्तांची पडझड होऊन ४० लाख १७ हजारांचे नुकसान झाले होते; पण यंदा तब्बल २ कोटी ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.