शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ दोन तुकड्यातच देणार; राजू शेट्टींनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:51 IST

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे

कोल्हापूर : उसाची एफआरपी एकरकमी देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, शेतकऱ्यांच्या अन्नात कोणी माती कालवणार असेल तर त्याला धडा शिकवला जाईल, रस्त्यावरील लढाईसाठी राज्य सरकारने सज्ज रहावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.केंद्र सरकारच्या ‘शुगर केन कंट्रोल ॲक्ट १९६६ अ’ नुसार शेतकऱ्यांना उसाची एफआरपी १४ दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, हा कायदा साखर कारखानदारांना अडचणीचा ठरत असल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे एफआरपी दोन तुकड्यात देण्याची मुभा मागितली होती. केंद्र सरकारने हा निर्णय संबंधित राज्यांना घेण्यास सांगितले.राज्य सरकारने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचे फर्मान काढले. त्याला सर्वच शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी २२ फेब्रुवारीला राज्य सरकारकडे केली होती. ती फेटाळून लावली असून तसे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी शेट्टी यांना पाठविले आहे.

स्वाभिमानी’कडून न्यायालयात आव्हानसाखर कारखानदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकारने केले आहे. केंद्र सरकारचा कायदा मोडण्याचा राज्यांना कोणी अधिकार दिला? याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे. याचे गंभीर परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. आता सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू करणार असून मोठे जनआंदोलन उभे करू. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी