शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ दोन तुकड्यातच देणार; राजू शेट्टींनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 11:51 IST

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे

कोल्हापूर : उसाची एफआरपी एकरकमी देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी राज्य सरकारने फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, शेतकऱ्यांच्या अन्नात कोणी माती कालवणार असेल तर त्याला धडा शिकवला जाईल, रस्त्यावरील लढाईसाठी राज्य सरकारने सज्ज रहावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.केंद्र सरकारच्या ‘शुगर केन कंट्रोल ॲक्ट १९६६ अ’ नुसार शेतकऱ्यांना उसाची एफआरपी १४ दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, हा कायदा साखर कारखानदारांना अडचणीचा ठरत असल्याने त्यांनी केंद्र सरकारकडे एफआरपी दोन तुकड्यात देण्याची मुभा मागितली होती. केंद्र सरकारने हा निर्णय संबंधित राज्यांना घेण्यास सांगितले.राज्य सरकारने दोन टप्प्यात एफआरपी देण्याचे फर्मान काढले. त्याला सर्वच शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी २२ फेब्रुवारीला राज्य सरकारकडे केली होती. ती फेटाळून लावली असून तसे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी शेट्टी यांना पाठविले आहे.

स्वाभिमानी’कडून न्यायालयात आव्हानसाखर कारखानदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकारने केले आहे. केंद्र सरकारचा कायदा मोडण्याचा राज्यांना कोणी अधिकार दिला? याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे. याचे गंभीर परिणाम महाविकास आघाडीला भोगावे लागतील. आता सरकारविरोधात आरपारची लढाई सुरू करणार असून मोठे जनआंदोलन उभे करू. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी