शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: धरणाची गळती काढायची हाय; जास्त ऊस लावू नका, पाटबंधारे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:29 IST

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड ...

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करावी, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.पत्रकात म्हटले आहे, पाटबंधारे मंडळ उत्तर विभागातर्फे दूधगंगा धरणाची गळती काढण्याच्या कामास यावर्षी सुरूवात करणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही हंगामांसाठी पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता २५.४० टीएमसी आहे. गेल्यावर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीमुळे २०.५४ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. या पावसाळ्यात पाऊस कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा सिंचनासाठी अपुरा झाला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणीसाठा २४.२२ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ इतका करण्यात आला आहे. सध्या आवर्तन सुरू आहेत. सध्याचा एकूण पाणीसाठा २३.२५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २१.८५ टीएमसी पाणीसाठा आहे.दरम्यान, दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षापेक्षा जास्त उसाची लागण करू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

शेतकऱ्यांमध्ये संतापदूधगंगा कालव्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. चार पैसे मिळवून देणारे पीक असल्याने बहुतांशी शेतकरी उसाची लागवड करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाने जास्त उसाची लागवड करू नका, असा अजब फतवा काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना धरणातील पाणी कमी करूनच गळती काढण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आगामी काळात पाटबंधारे प्रशासन आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणFarmerशेतकरी