शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: धरणाची गळती काढायची हाय; जास्त ऊस लावू नका, पाटबंधारे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:29 IST

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड ...

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करावी, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.पत्रकात म्हटले आहे, पाटबंधारे मंडळ उत्तर विभागातर्फे दूधगंगा धरणाची गळती काढण्याच्या कामास यावर्षी सुरूवात करणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही हंगामांसाठी पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता २५.४० टीएमसी आहे. गेल्यावर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीमुळे २०.५४ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. या पावसाळ्यात पाऊस कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा सिंचनासाठी अपुरा झाला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणीसाठा २४.२२ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ इतका करण्यात आला आहे. सध्या आवर्तन सुरू आहेत. सध्याचा एकूण पाणीसाठा २३.२५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २१.८५ टीएमसी पाणीसाठा आहे.दरम्यान, दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षापेक्षा जास्त उसाची लागण करू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

शेतकऱ्यांमध्ये संतापदूधगंगा कालव्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. चार पैसे मिळवून देणारे पीक असल्याने बहुतांशी शेतकरी उसाची लागवड करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाने जास्त उसाची लागवड करू नका, असा अजब फतवा काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना धरणातील पाणी कमी करूनच गळती काढण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आगामी काळात पाटबंधारे प्रशासन आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणFarmerशेतकरी