शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Kolhapur: धरणाची गळती काढायची हाय; जास्त ऊस लावू नका, पाटबंधारे प्रशासनाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 13:29 IST

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड ...

कोल्हापूर : दूधगंगा धरणाची गळती काढण्यासाठी धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करावी, असे आवाहन पाटबंधारे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.पत्रकात म्हटले आहे, पाटबंधारे मंडळ उत्तर विभागातर्फे दूधगंगा धरणाची गळती काढण्याच्या कामास यावर्षी सुरूवात करणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवश्यक पाणीसाठा धरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, या दोन्ही हंगामांसाठी पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करण्यात यावी. धरणाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता २५.४० टीएमसी आहे. गेल्यावर्षी दूधगंगा धरणाच्या गळतीमुळे २०.५४ टीएमसी पाणीसाठा करण्यात आला होता. या पावसाळ्यात पाऊस कमी झाला आहे. जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा सिंचनासाठी अपुरा झाला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून धरणात एकूण पाणीसाठा २४.२२ टीएमसी व त्यातील उपयुक्त पाणीसाठा २२.८२ इतका करण्यात आला आहे. सध्या आवर्तन सुरू आहेत. सध्याचा एकूण पाणीसाठा २३.२५ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा २१.८५ टीएमसी पाणीसाठा आहे.दरम्यान, दूधगंगा धरणाच्या गळती काढण्याच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गळती प्रतिबंधक कामास यावर्षी सुरुवात करण्यात येणार आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा आवश्यकतेनुसार कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, तसेच मागील वर्षापेक्षा जास्त उसाची लागण करू नये, जेणेकरून आर्थिक नुकसान टाळणे शक्य होईल.

शेतकऱ्यांमध्ये संतापदूधगंगा कालव्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. चार पैसे मिळवून देणारे पीक असल्याने बहुतांशी शेतकरी उसाची लागवड करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागाने जास्त उसाची लागवड करू नका, असा अजब फतवा काढल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असताना धरणातील पाणी कमी करूनच गळती काढण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची काय गरज आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या प्रकरणावरून आगामी काळात पाटबंधारे प्रशासन आणि लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणFarmerशेतकरी