शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नांदणी येथील शेतकरी म्हणतात, जय जवान, उत्स्फुर्त निधी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:25 IST

माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.

ठळक मुद्देनांदणी येथील शेतकरी म्हणतात, जय जवान, उत्स्फुर्त निधी जमाप्रतिटन एक रुपया संकलित करण्याचा संकल्प, आवाहनाला प्रतिसाद

यड्राव : माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नांदणी येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. प्रारंभी पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी येथील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यास पुरविलेल्या उसाच्या प्रतिटन एक रुपया देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या बैठकीला पोलीस निरीक्षक कटकधोंड, सरपंच विद्या संकेश्वरे, उपसरपंच मायगोंडा पाटील आदी उपस्थित होते.नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. देशाच्या रक्षणासाठी जवान रात्रंदिवस जागत असतात तसेच आपल्याच देशबांधवांना अन्नधान्य पुरवण्यासाठी किसानही रात्रंदिवस राबत असतो. परंतु त्यांच्यावर संकट आले की दु:ख व्यक्त करण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे हे दोन्ही घटक उपेक्षित राहतात. पुलवामा हल्ल्यामुळे ही भावना अधिक जाणवली, त्यातून संकटग्रस्त जवान आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्यासाठी नांदणी येथील शेतकरी पुढे सरसावले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जाळे देशभर असल्याने या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. संकलित होणाऱ्या या निधीतून वीरमरणप्राप्त जवानांचे कुटूंबिय, जखमी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा आदर्श उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचविण्यात येणार आहे. ज्या-त्या भागात निधी संकलन करून त्या-त्या भागातील संकटग्रस्तांना मदत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हा निधी शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधीकडे संकलित करण्यात येणार असल्याने तो संकटग्रस्तापर्यंत निश्चिंतपणे पोहचू शकेल, याबाबत कोणासही शंका राहणार नाही, अशी चर्चा या बैठकीत झाली.देशाचे रक्षणकर्ता व देशासाठी अन्नधान्य निर्माण करणारे दोन्ही देशसेवक उपेक्षित आहेत.परंतु शेतकऱ्यांनी जवानांसह आपल्या बांधवासाठी घेतलेला हा उपक्रम मोठा आहे. सर्वसामान्यांना एखाद्या मोठ्या संकटप्रसंगी मदत करण्याची इच्छा असते, परंतु ती कोठे करावी याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे या उपक्रमामार्फत सर्वजण उस्फुर्तपणे मदत करत देशबांधवांसाठी पुढे सरसावले आहेत.

नांदणी येथील शेतकरी बांधवांनी देशप्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे, संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम लवकरच देशभर पोहचेल अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सागर संभूशेटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर