शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

नांदणी येथील शेतकरी म्हणतात, जय जवान, उत्स्फुर्त निधी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:25 IST

माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.

ठळक मुद्देनांदणी येथील शेतकरी म्हणतात, जय जवान, उत्स्फुर्त निधी जमाप्रतिटन एक रुपया संकलित करण्याचा संकल्प, आवाहनाला प्रतिसाद

यड्राव : माजी पंतप्रधान लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान ही घोषणा दिली होती. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी किसानही पुढे सरसावला आहे. साखर कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या टनामागील एक रुपया जवानांसाठी देण्याचे आवाहन नांदणी ता. शिरोळ येथील शेतकऱ्यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळत असून उत्स्फुर्त निधी जमा होत आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नांदणी येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात चर्चा झाली. प्रारंभी पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी येथील शेतकऱ्यांनी साखर कारखान्यास पुरविलेल्या उसाच्या प्रतिटन एक रुपया देण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या बैठकीला पोलीस निरीक्षक कटकधोंड, सरपंच विद्या संकेश्वरे, उपसरपंच मायगोंडा पाटील आदी उपस्थित होते.नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा उपक्रम देशभर राबविण्यात येणार आहे. देशाच्या रक्षणासाठी जवान रात्रंदिवस जागत असतात तसेच आपल्याच देशबांधवांना अन्नधान्य पुरवण्यासाठी किसानही रात्रंदिवस राबत असतो. परंतु त्यांच्यावर संकट आले की दु:ख व्यक्त करण्याशिवाय पर्याय नसतो. यामुळे हे दोन्ही घटक उपेक्षित राहतात. पुलवामा हल्ल्यामुळे ही भावना अधिक जाणवली, त्यातून संकटग्रस्त जवान आणि शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्यासाठी नांदणी येथील शेतकरी पुढे सरसावले आहेत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जाळे देशभर असल्याने या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. संकलित होणाऱ्या या निधीतून वीरमरणप्राप्त जवानांचे कुटूंबिय, जखमी जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

नांदणीच्या शेतकऱ्यांचा हा आदर्श उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचविण्यात येणार आहे. ज्या-त्या भागात निधी संकलन करून त्या-त्या भागातील संकटग्रस्तांना मदत देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. हा निधी शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधीकडे संकलित करण्यात येणार असल्याने तो संकटग्रस्तापर्यंत निश्चिंतपणे पोहचू शकेल, याबाबत कोणासही शंका राहणार नाही, अशी चर्चा या बैठकीत झाली.देशाचे रक्षणकर्ता व देशासाठी अन्नधान्य निर्माण करणारे दोन्ही देशसेवक उपेक्षित आहेत.परंतु शेतकऱ्यांनी जवानांसह आपल्या बांधवासाठी घेतलेला हा उपक्रम मोठा आहे. सर्वसामान्यांना एखाद्या मोठ्या संकटप्रसंगी मदत करण्याची इच्छा असते, परंतु ती कोठे करावी याची माहिती त्यांना नसते. त्यामुळे या उपक्रमामार्फत सर्वजण उस्फुर्तपणे मदत करत देशबांधवांसाठी पुढे सरसावले आहेत.

नांदणी येथील शेतकरी बांधवांनी देशप्रेमापोटी हा निर्णय घेतला आहे, संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम लवकरच देशभर पोहचेल अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष सागर संभूशेटे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर