शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी तिसऱ्या कर्जमाफीचेही लाभार्थी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:43 IST

आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरणार आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरअखेर २२०३ कोटींचे कृषिकर्ज वाटप : त्यात १४८५ कोटींचे पीककर्ज

कोल्हापूर : राज्यात पहिल्यांदाच स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ने सत्तेवर आल्याच्या पहिल्याच दिवशी कृषिकर्ज कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकरी सलग तिस-या कर्जमाफीचे लाभार्थी ठरणार आहेत. साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंत २२०३ कोटींचे कृषिकर्ज वाटप झाले असून त्यात १४८५ कोटी रुपये निव्वळ पीककर्ज आहे.

मागील युती सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ दिला गेला. या योजनेतून थकीत पीक कर्जमाफी झाली; पण ती सरसकट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी देऊ, असे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. या तिघांची एकत्रित सत्ता स्थापन होत असताना शपथविधीआधीच समान कार्यक्रमाची घोषणा करतानाच पहिल्यांदा कृषिकर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे जाहीर केले.

त्यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या ९७ हजार शेतक-यांना २६७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेतून दीड लाख शेतकºयांना ४४५ कोटींची कर्जमाफी झाली आहे. ही एकत्रित कर्जमाफी ७१२ कोटी रुपयांची होते.

आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरणार आहे. तरीदेखील आतापर्यंत वाटप झालेल्या कृषिकर्जाची माहिती घेतली असता १ एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी अशा बँकांतून २२०३ कोटी रुपयांचे कृषिकर्ज वाटप झाले आहे. त्यात एक लाख ५८ हजार ९९७ शेतकºयांनी १४८५ कोटींचे निव्वळ पीक कर्ज उचलले आहे. उर्वरित ७१८ कोटींचे कर्ज हे मध्यम व दीर्घ मुदतीचे कृषिकर्ज आहे. 

एकूण कृषिकर्ज वाटपबँक वाटप रक्कम (कोटींमध्ये)राष्ट्रीयीकृत ६९४खासगी २६५ग्रामीण ०४सहकारी १२४०एकूण २२०३----------------------------------------पीककर्जबँक शेतकरी संख्या वाटप रक्कम (कोटींमध्ये)राष्ट्रीयीकृत २६९२४ ३२३खासगी ६१४८ ९५ग्रामीण २४५ ०३सहकारी १२५६८० १०६४------------------------------------एकूण १५८९९७ १४८५ 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार