शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी तिसऱ्या कर्जमाफीचेही लाभार्थी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:43 IST

आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरणार आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरअखेर २२०३ कोटींचे कृषिकर्ज वाटप : त्यात १४८५ कोटींचे पीककर्ज

कोल्हापूर : राज्यात पहिल्यांदाच स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ने सत्तेवर आल्याच्या पहिल्याच दिवशी कृषिकर्ज कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे जिल्ह्यातील दीड लाखाहून अधिक शेतकरी सलग तिस-या कर्जमाफीचे लाभार्थी ठरणार आहेत. साधारणपणे एप्रिल ते सप्टेंबरअखेरपर्यंत २२०३ कोटींचे कृषिकर्ज वाटप झाले असून त्यात १४८५ कोटी रुपये निव्वळ पीककर्ज आहे.

मागील युती सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान कृषी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ दिला गेला. या योजनेतून थकीत पीक कर्जमाफी झाली; पण ती सरसकट न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. सत्तेत आल्यानंतर सरसकट कर्जमाफी देऊ, असे काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनेही आपल्या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. या तिघांची एकत्रित सत्ता स्थापन होत असताना शपथविधीआधीच समान कार्यक्रमाची घोषणा करतानाच पहिल्यांदा कृषिकर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले जाईल, असे जाहीर केले.

त्यानुसार जिल्ह्यातील शेतकºयांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या ९७ हजार शेतक-यांना २६७ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेतून दीड लाख शेतकºयांना ४४५ कोटींची कर्जमाफी झाली आहे. ही एकत्रित कर्जमाफी ७१२ कोटी रुपयांची होते.

आता नव्याने कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर याची माहिती मागविण्याचे काम सुरू होणार आहे. ही कर्जमाफी सरसकट असणार आहे, असे म्हटले जात असले तरी तिलाही निकष लावले जाणार असल्याने जीआर निघाल्यानंतरच नेमकी कुणाचे किती आणि कोणत्या स्वरूपाचे कर्ज माफ होणार हे ठरणार आहे. तरीदेखील आतापर्यंत वाटप झालेल्या कृषिकर्जाची माहिती घेतली असता १ एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत राष्ट्रीयीकृत, खासगी, ग्रामीण आणि सहकारी अशा बँकांतून २२०३ कोटी रुपयांचे कृषिकर्ज वाटप झाले आहे. त्यात एक लाख ५८ हजार ९९७ शेतकºयांनी १४८५ कोटींचे निव्वळ पीक कर्ज उचलले आहे. उर्वरित ७१८ कोटींचे कर्ज हे मध्यम व दीर्घ मुदतीचे कृषिकर्ज आहे. 

एकूण कृषिकर्ज वाटपबँक वाटप रक्कम (कोटींमध्ये)राष्ट्रीयीकृत ६९४खासगी २६५ग्रामीण ०४सहकारी १२४०एकूण २२०३----------------------------------------पीककर्जबँक शेतकरी संख्या वाटप रक्कम (कोटींमध्ये)राष्ट्रीयीकृत २६९२४ ३२३खासगी ६१४८ ९५ग्रामीण २४५ ०३सहकारी १२५६८० १०६४------------------------------------एकूण १५८९९७ १४८५ 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार