शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बोगस वीज बिलातून शेतकऱ्यांची बदनामी -प्रताप होगाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 1:14 AM

स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट राज्य वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्या यासह

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद -संडे स्पेशल मुलाखत --महाराष्ट वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आजतागायत चार हजार कोटींहून अधिक रकमेचा वीज ग्राहकांना लाभ मिळून दिला आहे.

अतुल आंबी ।स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन व महाराष्ट राज्य वीज ग्राहक संघटना यांच्यावतीने कृषी पंपाची वीज जोडणी त्वरित द्या यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर काढण्यात येणाºया धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्याशी साधलेला थेट संवाद...

प्रश्न : कृषी पंप वीज बिलातून शेतकऱ्यांचा नेमका तोटा काय व कसा?उत्तर : वीज नियामक आयोगाने सहावेळा दरवाढ जाहीर केली. मात्र, सरकारने त्यावर आजतागायत एकदाही सवलतीचा दर जाहीर केला नाही. परिणामी शेतकºयांच्या वीज बिलात अडीचपट वाढ झाली. एकूण ४२ लाख ग्राहकांपैकी १६ लाख पंपांना मीटर नाही, तर २६ लाख जोडण्यांना मीटर लावले आहेत. मात्र, त्यातील फक्त २० टक्केच मीटर सुरू आहेत व ८० टक्के ग्राहकांना सरासरी बिल केले जाते. त्यामुळे १६ लाख ग्राहकांवर वीज वितरणमधील गळती, चोरी व भ्रष्टाचार यातील नुकसानीचे युनिट टाकून बोगस बिल केले जाते. त्यामुळे शेतकºयाची बदनामी होते.

प्रश्न : बोगस बिल कसे बनते?उत्तर : याची सुरुवात २०१०-११ पासून झाली आहे. वीज वहन व गळती १५ टक्के दाखवली जाते, तर शेती पंपाचा वापर ३० टक्के दाखविला जातो. प्रत्यक्षात मात्र हे आकडे उलट आहेत. महावितरणकडून शेतकºयांच्या जोडणीला अडीच पट अधिक अश्वशक्तीचे बिल वाढवून लावले जाते.

प्रश्न : यंत्रमागधारकांना दिलेल्या सवलतीत कशी फसवणूक झाली आहे?उत्तर : २७ अश्वशक्तीवरील दहा हजार ग्राहक, तर २७ अश्वशक्तीखालील ८० हजार आहेत. दोघांचाही सरासरी वीज वापर अंदाजे दोन हजार दशलक्ष युनिट आहे. सरकारने २७ अश्वशक्तीवरील ग्राहकांचा १ रुपये कापला व २७ अश्वशक्तीखालील ग्राहकांना दिला.बोगस सबसिडी दाखवून लूटसत्तेवर येण्यापूर्वी हे सरकार संघटनेबरोबर सहभागी होत होते. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीज बिले जाळायला सोबत होते. आता संपूर्ण माहिती असूनही निर्णय घेतला जात नाही. सरकारच्या अशा धोरणांमुळे शेतकºयांसह सर्व प्रकारच्या ग्राहकांना नुकसान सहन करावे लागत आहे. बोगस सबसिडी दाखवून सरकारच्या मान्यतेने लूट केली जात आहे.योजना फेलसरकारची कृषी संजीवनी योजना सन २०१४ (अजित पवार) व सन २०१७ (चंद्रशेखर बावनकुळे) या दोन्ही योजना बोगस वीज बिलांच्या फुगवट्यामुळे फेल गेल्या. त्यानंतर कर्जमाफी केली. सन्मान योजना राबवली. शेतकºयांनी न वापरलेल्या बोगस वीज युनिटचा भार याच्यावर टाकला जातो आणि गोंडस नावाच्या योजना दाखविल्या जातात. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर