शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

हत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 7:11 PM

forest department Kolhapur- हत्तींमुळे नुकसान झालेल्या सेनापती कापशी परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा़ असे आवाहन वन विभागाने केले असून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागास भेट दिली.

ठळक मुद्देहत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार पंधरा दिवसात भरपाई वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी दिली नुकसानग्रस्त भागास भेट

कोल्हापूर : हत्तींमुळे नुकसान झालेल्या सेनापती कापशी परिसरातील शेतकऱ्यांना वन विभागाकडून पंधरा दिवसांत नुकसान भरपाई मिळणार असून संबंधित शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा़ असे आवाहन वन विभागाने केले असून शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागास भेट दिली.दरम्यान, हा हत्ती ज्या मार्गाने वस्तीत आला होता, त्याच मार्गाने त्याला गुरुवारी वन विभागाच्या ५२ वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने जंगलाकडे मार्गस्थ केले. आता या हत्तीचा आजरा तालुक्यातील अरळकुंडी परिसरात मुक्काम आहे.या नुकसानग्रस्त भागास आज, शुक्रवारी सकाळी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उपवन संरक्षक आर. आर. काळे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी फिरत्या पथकाचे वनपेत्रपाल युवराज पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळवेकरही उपस्थित होते.पंधरा दिवसात भरपाई देण्याचे नियोजनपंचनामे लवकरात लवकर कन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसात भरपाई देण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असून आठ दिवसांत भरपाई देण्यासाठी वन खाते प्रयत्नशील आहे. यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधीची भेट घेऊन हत्तीप्रवण भागातील शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देणार असल्याचे सांगितले आहे.वनविभागाचे स्वतंत्र पथक कार्यरत राहणारनुकसानग्रस्त भागात वनविभागाचे स्वतंत्र पथक गस्तीसाठी कार्यरत राहणार असून पुन्हा हत्तीचे दर्शन झाल्यास तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन वन विभागाने केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तीने नुकसान केले आहे, त्यांनी तत्काळ वन विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनवले यांनी केले आहे.कोटजंगल परिसरातील वन्यप्राणी नागरी वस्तीत वारंवार येत असतात. अशावेळी ग्रामस्थांनी गर्दी करू नये. यावेळी हत्तीला आवरण्याऐवजी बघ्यांची गर्दीच नियंत्रित करण्यासाठी वन विभागाची शक्ती खर्च झाली. यासाठी लोकांचे प्रबोधन करण्यासाठी वन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्याचा मानस असून ग्रामस्थांनी वन्यप्राणी आढळल्यास गर्दी करू नये, संयम बाळगावा.- सुधीर सोनवले,परिक्षेत्र वन अधिकारी, करवीरकोल्हापूर वन विभाग(संदीप आडनाईक)

 

 

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर