शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

कोल्हापुरातील कणेरी मठाजवळ शेतकऱ्याला आढळली मानवी कवटी, अनेक तर्कवितर्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:53 IST

चार दिवस झाले तपासाला यश नाही

गोकुळ शिरगाव : कणेरी मठाच्या परिसरात शेतकऱ्याला शेतात काम करत असताना मानवी कवटी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. सागर बाळासो आडनाईक (वय ४०, रा. वरचा माळ, कणेरी) यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हत्ती गवताच्या शेतात त्यांना अज्ञात व्यक्तीची मानवी कवटी आढळून आली. कवटी सापडल्याची बातमी गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कवटी ताब्यात घेतली. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, चार दिवस उलटून गेले तरी पोलिसांना तपासात अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.मिळालेल्या माहितीनुसार, आडनाईक नेहमीप्रमाणे शेतात काम करत होते. त्यावेळी त्यांना गवतात मानवी कवटी आढळली. त्यांनी तातडीने याची माहिती गावातील लोकांना दिली. त्यानंतर तत्काळ गोकुळ शिरगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कवटी ताब्यात घेतली आणि पंचनामा केला. कवटी अधिक तपासणीसाठी पाठवली आहे. मात्र, ही कवटी कोणाची आहे, ती या ठिकाणी कशी आली आणि यामागे काही घातपात आहे का, याबद्दल पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.कवटीबाबत अनेक तर्कवितर्क पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. मात्र, तरीही पोलिसांना तपासात अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी नागरिकांना या संदर्भात काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. मानवी कवटी सापडल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. या घटनेमुळे पोलिस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस