शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

कौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:14 IST

Crime news Kolhapur-कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

ठळक मुद्देकौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी धक्कादायक प्रकार : बेळगाव येथील दोघा भावांसह चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

कोल्हापूरातील उपनगरात राहणार्या कंजारभाट समाजातील दोघी बहिणींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा आधार घेत राजारामपूरी पोलीस ठाण्यात बेळगाव येथील संदीप सनी गागडे व सुरजीत गागडे या दोघा सख्ख्या भावांसह चौघांवर तक्रार दिली. माणुसकिला काळीमा फासणारा या प्रकाराबद्दल संतापाची लाट उमटत आहे.कोल्हापुरातील उपनगरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमान नगरातील संदीप व सुरजीत गागडे यांच्यासोबत दि. २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. दोन्ही कुटूंबिय एकाच समाजातील असल्याने त्यांच्यात कोमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली.

घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांच शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू झाले. लग्नांनतर तीन दिवस या मुलींशी त्या पतींनी त्यांच्याशी शारिरीक संबधही ठेवले. त्यांनंतर त्यांनी त्या दोघींना घरातून हाकलून काढून कोल्हापूरात माहेरी पाठवले. मुलींच्या नातेवाईकांनी संबध जुळवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात अपयश आले.दरम्यान दि. ३ फेब्रुवारीला दोन्ही मुलींना व त्याच्या आईला कोल्हापुरात शाहू टोल नाक्यानजीकच्या एका मंदीरात बोलावून घेतले. तिथं जात पंचायत बसवली. पंचायतीने त्या दोन मुलींना काडीमोड झाल्याचा निर्णय दिला. तसेच दोन्ही मुले आणि मुलींना समाजातील विवाह इच्छुकांची विवाह करण्याचे स्वातंत्र असल्याचही स्पष्ट केले. पंचयतीने अचानक दिलेल्या या निर्णयान पीडित मुलींच्यावर आभाळ कोसळले.घटनेनंतर पिडीत मुलींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलन समितकडे रितसर अर्ज केला. त्यानुसार गुरुवारी राजारामपूरी पोलीस ठाण्यात संदीप गागडे, सुरजीत गागडे या दोघा भावांसह शोभा सनी गागडे, इश्वर गागडे यांच्याविरोधात तक्रार दिली. घटनेनंतर पीडित त्यांच्यावर तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यत सुरु होते.

पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रितसर लेखी दाद मागितली. त्यानुसार आम्ही पिडीत मुलींना घेऊन समितीच्या गीता हसुरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली- सुजाता म्हेत्रे (अंनिस पदाधिकारी)

बाभळीच्या काट्या अन काडीमोडशाहू टोल नाक्यानजीक मंदीरात जात पंचायतीने पिडीत मुली व संशयीत दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच कांड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकावर पाचवेळा मारुन त्या मुलींवरुन उतरुन दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. असा जात पंचायतीचा नात्यातील काडीमोडची प्रथा असल्याचे पिडीतांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर