शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:14 IST

Crime news Kolhapur-कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

ठळक मुद्देकौमार्य चाचणीत अपयशी, दोघी बहीणींना पाठवले कोल्हापूरात माहेरी धक्कादायक प्रकार : बेळगाव येथील दोघा भावांसह चौघांवर गुन्हा

कोल्हापूर : कौमार्य परिक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहीणींना विवाहनंतर अवघ्या तिसर्या दिवशी कोल्हापूरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

कोल्हापूरातील उपनगरात राहणार्या कंजारभाट समाजातील दोघी बहिणींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा आधार घेत राजारामपूरी पोलीस ठाण्यात बेळगाव येथील संदीप सनी गागडे व सुरजीत गागडे या दोघा सख्ख्या भावांसह चौघांवर तक्रार दिली. माणुसकिला काळीमा फासणारा या प्रकाराबद्दल संतापाची लाट उमटत आहे.कोल्हापुरातील उपनगरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमान नगरातील संदीप व सुरजीत गागडे यांच्यासोबत दि. २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. दोन्ही कुटूंबिय एकाच समाजातील असल्याने त्यांच्यात कोमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली.

घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांच शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू झाले. लग्नांनतर तीन दिवस या मुलींशी त्या पतींनी त्यांच्याशी शारिरीक संबधही ठेवले. त्यांनंतर त्यांनी त्या दोघींना घरातून हाकलून काढून कोल्हापूरात माहेरी पाठवले. मुलींच्या नातेवाईकांनी संबध जुळवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात अपयश आले.दरम्यान दि. ३ फेब्रुवारीला दोन्ही मुलींना व त्याच्या आईला कोल्हापुरात शाहू टोल नाक्यानजीकच्या एका मंदीरात बोलावून घेतले. तिथं जात पंचायत बसवली. पंचायतीने त्या दोन मुलींना काडीमोड झाल्याचा निर्णय दिला. तसेच दोन्ही मुले आणि मुलींना समाजातील विवाह इच्छुकांची विवाह करण्याचे स्वातंत्र असल्याचही स्पष्ट केले. पंचयतीने अचानक दिलेल्या या निर्णयान पीडित मुलींच्यावर आभाळ कोसळले.घटनेनंतर पिडीत मुलींनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मलन समितकडे रितसर अर्ज केला. त्यानुसार गुरुवारी राजारामपूरी पोलीस ठाण्यात संदीप गागडे, सुरजीत गागडे या दोघा भावांसह शोभा सनी गागडे, इश्वर गागडे यांच्याविरोधात तक्रार दिली. घटनेनंतर पीडित त्यांच्यावर तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशीरापर्यत सुरु होते.

पिडीत मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रितसर लेखी दाद मागितली. त्यानुसार आम्ही पिडीत मुलींना घेऊन समितीच्या गीता हसुरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपूरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली- सुजाता म्हेत्रे (अंनिस पदाधिकारी)

बाभळीच्या काट्या अन काडीमोडशाहू टोल नाक्यानजीक मंदीरात जात पंचायतीने पिडीत मुली व संशयीत दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच कांड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकावर पाचवेळा मारुन त्या मुलींवरुन उतरुन दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. असा जात पंचायतीचा नात्यातील काडीमोडची प्रथा असल्याचे पिडीतांनी सांगितले.

टॅग्स :WomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर