शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा तलावातील मत्स्य जाती होताहेत नामशेष : प्रदूषणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:10 IST

अमर पाटील । कळंबा : कधी काळी जैवविविधतेसह विविध प्रकारच्या मत्स्य जाती आढळणाऱ्या रंकाळा तलावास आज प्रदूषणाचे ग्रहण लागले ...

ठळक मुद्देरोही, वाम, मरळ, कटला, आदी जाती धोक्यात

अमर पाटील ।कळंबा : कधी काळी जैवविविधतेसह विविध प्रकारच्या मत्स्य जाती आढळणाऱ्या रंकाळा तलावास आज प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. पाणी प्रदूषणात वाढ झाल्याने वाम, मरळ, कटला व रोही या जातींचे मोठ्या प्रमाणावर आढळणारे मासे नामशेष होऊ लागल्याने चिलाप जातीचा एकमेव मासाच आता जास्त प्रमाणात भव्य जलाशयातून मच्छिमारांच्या हाती लागत असल्याने जिल्ह्यात नावलौकिक असणाºया रंकाळा तलावातील गोड्या पाण्यातील मासा आता बेचव झाला आहे.

पूर्वी गोड्या पाण्यातील चवदार मासा म्हटले की, रंकाळा तलावाचे नाव घेतले जायचे. भागातील हजारो कुटुंबियांचा उदरनिर्वाह पूर्वी विविध प्रजातींच्या चवदार आढळणाºया मासेमारीवर चालायचा. सुरुवातीला तलावात प्रामुख्याने वाम, मरळ, कटला, रोही, शिंगटा, गुगळी, चिलाप, चांभोरी, बोदवा, श्ािंगी, मांगूर, झिंगा, अरळी, कानस, गवत्या, डोकडा असे नानाविध प्रकारचे चविष्ठ मासे मोठ्या प्रमाणात मच्छिमारांच्या जाळ्यासह गळासही लागत होते.

रंकाळा तलावात मिसळणाºया प्रदूषित पाण्याने वाम, मरळ, कटला, आहेर, खद्री, रोही, डोकडा या चवदार माशांची वाढ होत नाही, तर चिलाप मासा या प्रदूषित पाण्यात तग धरून राहू शकत असल्याने चवदार माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून, चिलाप हा मासा तलावात आज मोठ्या प्रमाणावर जाळ्यात सापडत आहे.चिलाप माशांचे अनेक गुणधर्म इतर माशांच्या जातींसाठी त्रासदायक असतात. अतिशय खडतर परिस्थितीमध्ये व प्रदूषित पाण्यातही ते राहू शकतात. रंकाळा तलावात चिलाप माशांची वाढ होण्याचे आणखी कारण म्हणजे त्यांच्याकडे प्रदूषित पाण्यात प्रचंड पचनक्षमता असल्याने त्यांच्या वाढीस बळ मिळत आहे.

अलीकडे दहा-बारा वर्षांत चिलाप मासाच ९० टक्के मिळू लागला आहे. वाम, मरळ, कटला व रोही मासे दुर्मीळ झाले आहेत. आहेर व खद्री मासा तर नामशेष झाला आहे. पर्यावरणपे्रमींनी प्रदूषणमुक्त रंकाळा मोहीम राबविण्याची, तर पालिका जैवविविधता समितीने विविध मत्स्य जाती सोडण्याची गरज आता निर्माण झाली आहे.प्रदूषणामुळे जैवविविधतेवर परिणामतलावाभोवती नागरी वस्त्यांचा मोठा विळखा पडला असून, याचे सांडपाणी थेट तलावात मिसळत आहे. पाण्यातील फॉस्फेटचे प्रमाण वाढल्याने तलावात विषारी जलपर्णी फोफावल्या आहेत. प्लास्टिकचे विघटन न होणारा कचरा तलावात तरंगत आहे. पाण्याचा वापर जनावरांना अंघोळ, कपडे धुणे यासाठी होत आहे. परिणामी, माशांच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन तलावातील जैवविविधतेवर याचा मोठा परिणाम होत आहे. 

‘मत्स्यबीज विभागाचे मदतीने रंकाळा तलावातील विविध मत्स्य जातींचा अभ्यास करून प्रशासनास अहवाल सादर केला. पूर्वी तलावात ७२ विविध प्रजातींचे मासे आढळून येत होते. २००९ च्या पाहणीत फक्त ३० प्रजाती आढळून आल्या. पर्यावरणाचा ºहास, नैसर्गिक स्थित्यंतरे व जलपर्णीची व्याप्ती, वाढते प्रदूषण यामुळे रंकाळा तलावातील माशांच्या विविध प्रजाती कमी होत आहेत. मत्स्यबीज विभाग, पालिका प्रशासन व पालिका जैवविविधता समिती याबाबत गंभीर नाही’- उदय गायकवाड, पर्यावरण तज्ञ व सदस्य पालिका जैवविविधता समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरpollutionप्रदूषण