शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

कारखानदारांच्या छाताडावर बसून २०० रुपये ऊसदर जादा घेवू, राजू शेट्टींनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 14:36 IST

विधानसभेत एफआरपीचे तुकडे पाडताना तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोंड उघडले नाही. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर एक रक्कमी देण्याचे सुतोवाच करत आहेत. हेच त्यांनी विधानसभेत बोलले असते तर त्यांची मिरवणूक काढली असती.

दत्ता पाटील

म्हाकवे (कोल्हापूर): ऊसाचे अर्धा-पाव टन वजन वाढावे यासाठी कुटुंबियांना उन्हातान्हात कांड्या गोळा करायला लागतात. मात्र, साखर कारखानदार सहजपणे एका वाहनामागे दीड ते अडीच टनाची काटामारी करुन कोट्यावधीचा दरोडा घालत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी या साखर चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी एकजूट करावी असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. चार वर्षात वाढत्या महागाईनुसार ऊसदरात वाढ झालेली नाही अशी खंत व्यक्त करत गतवर्षीचे २०० रुपये कारखानदारांच्या छाताडावर बसून घेवू असा इशाराही शेट्टी यांनी दिला.आणूर (ता. कागल) येथे जागर एफआरपीचा संघर्ष ऊस दराचा या अंतर्गत सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच रेखा तोडकर होत्या. यावेळी शेट्टी यांनी शेतकऱ्यांना १५ ऑक्टोबरच्या ऊसपरिषदेचेही शेतकऱ्यांना निमंत्रण दिले. यावेळी संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, सागर कोळी यांनी मनोगते व्यक्त केली.तर मुश्रीफांची मिरवणूक काढली असतीविधानसभेत एफआरपीचे तुकडे पाडताना तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी तोंड उघडले नाही. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर एक रक्कमी देण्याचे सुतोवाच करत आहेत. हेच त्यांनी विधानसभेत बोलले असते तर त्यांची मिरवणूक काढली असती असे म्हणत बाळासाहेब पाटील यांनी मुश्रीफांवर हल्लाबोल चढवला.शेतकऱ्यांना संरक्षण कधी?मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करून झेड प्लस केली. मात्र, रात्री अपरात्री शेतशिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संरक्षणाचे काय? असा खणखणीत सवाल अजित पोवार यांनी करताच शेतकऱ्यांनी टाळयांनी दाद दिली.कागलमध्ये ऊसदरात इर्षा का नाही?कागल तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय गटाचे पाच कारखाने आहेत. राजकारणात जी इर्षा असते. ती ऊसदर देताना का नसते असा सवाल करत आता शेतकरी अडाणी राहिलेला नाही. आम्ही फुकटचे मागत नाही तर घामाचे दाम मागतोय असा इशाराही कोंडेकर यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना