शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Kolhapur: सतेज पाटील यांच्याकडून अपेक्षा वाढल्या!; गडहिंग्लज विभागात नावालाच काँग्रेस, तरीही लोकसभेला भरभरून मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 15:58 IST

हे आहेत कळीचे प्रश्न !

राम मगदूमगडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात काँग्रेस पक्ष सध्या नावालाच आहे. तरीही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना गडहिंग्लज विभागाने भरभरून मते दिली. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्याकडून या विभागाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.शेकाप, जनता दलाचा अपवाद वगळता या विभागाचे नेतृत्व काँग्रेस / राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे दीर्घकाळ राहिले. व्ही. के. चव्हाण-पाटील, नरसिंगराव पाटील, डॉ. एस. एस. घाळी, बळीराम देसाई, बाबासाहेब कुपेकर, श्रीपतराव शिंदे यांचा दबदबा राज्यभर होता. परंतु, त्यांच्यानंतर तीनही तालुक्यात सर्वसमावेशक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. म्हणूनच, सर्वसामान्य जनतेने मोठ्या आशेने पुन्हा काँग्रेसची कास धरली आहे.स्वातंत्र्यानंतर साखर कारखाना, तालुकासंघ, बाजार समिती, सूतगिरणी आदींच्या माध्यमातून डोंगराळ भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न काँग्रेसच्या पहिल्या पिढीतील नेत्यांनी पाहिले. परंतु, सुरुवातीचे भरभराटीचे दशक वगळता त्यांच्या हयातीतच या संस्थांना घरघर लागली, त्यांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. म्हणूनच त्यात सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी आमदार पाटील यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

पक्ष पुनर्बांधणीची गरजचंदगडमध्ये गोपाळराव पाटील, कल्लाप्पा भोगण, जे. बी. पाटील यांनी नव्या उमेदीने काँग्रेसची पताका खांद्यावर घेतली आहे. आजऱ्यात जयवंतराव शिंपी, उमेश आपटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. गडहिंग्लजमध्ये अप्पी पाटील यांच्या रूपाने तालुक्यात आणि स्वाती कोरी यांच्यामुळे शहरात काँग्रेसला बळ मिळाले आहे. परंतु, नव्या उमेदीने गावपातळीवर पुढे आलेल्या महिला, तरुणांना पाठबळ देऊन पक्षाची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे.

निष्ठावंतांना बळ द्यावे‘गोकुळ’ला दर्जेदार, सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या गडहिंग्लज विभागात अंजना रेडेकर या एकमेव संचालक आहेत. चंदगड-गडहिंग्लजला प्रतिनिधित्वच नाही. जिल्हा बँकेतील तीनही तालुक्यांतील संचालक हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे बँकेच्या स्वीकृत संचालकपदी काँग्रेसच्या येथील निष्ठावंताला संधी मिळाली. विद्याधर गुरबे, राजेंद्र परीट, संजय सावंत, नौशाद बुढेखान या कार्यकर्त्यांना बळ द्यावे.हे आहेत कळीचे प्रश्न !हिरण्यकेशी व घटप्रभा खोऱ्यातील पूरग्रस्तांचे पुर्नवसन, गडहिंग्लज व चंदगड तालुक्याच्या पूर्वभागाला हक्काचे पाणी, बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.काँग्रेसच्या विजयात भागीदारी !गेल्यावेळी संजय मंडलिकांना गडहिंग्लज विभागातून ५२ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हे मताधिक्य तोडून ८,९३८ मतांची आघाडी शाहू महाराजांना दिली. म्हणजेच, त्यांच्या विजयात सुमारे ६० हजार मतांची भागीदारी ‘गडहिंग्लज’करांनी केली. त्याची उचित नोंद नेतृत्वाने व पक्षाने घ्यायला हवी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस