शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाडची राजकीय परंपरा संपुष्टात

By admin | Updated: December 5, 2014 00:22 IST

विधानसभा निवडणूक : कॉँग्रेस नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ, पालिका निवडणुकीवर बदलत्या राजकीय समीकरणाचा परिणाम

गणपती कोळी - कुरूंदवाड -येथील शहरावर कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारांचाच पगडा आहे. त्यामुळे पालिका स्थापनेपासून आजतागायत लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला एकतर्फी मताधिक्य मिळाले आहे. या विधानसभा निवडणुकीत हा विचार इतिहासजमा झाला असून, प्रथमच शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे शहराच्या कॉँग्रेस नेतृत्वावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून, नव्या राजकीय समीकरणाचा परिणाम नगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी एकवेळा विधानसभा व दोनवेळा लोकसभा निवडणूक लढविली. ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विश्वासू नेतृत्व करत तिन्ही वेळा ‘व्होट’ आणि ‘नोट’चा नारा देत प्रचंड मताधिक्क्याने विजयी झाले. अशा परिस्थितीतही पंचगंगा कारखान्याच्या माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम, आमदार डॉ. सा. रे. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे या कॉँग्रेसच्या, तर राष्ट्रवादीच्या माजी खा. निवेदिता माने यांच्या पाठीशीच शहरातील मतदार राहिले. त्यामुळे कॉँग्रेसी विचारांचा पगडा या शहरावर कायम राहिला आहे. शहरातील कॉँग्रेसचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, शहराध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे आहे. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार सा. रे. पाटील यांच्या पाठीशीच राहून शहरातील मतदार कॉँग्रेसी विचारांची परंपरा चालवतील, अशी आशा होती. मात्र, तालुक्यातील बदलते राजकीय समीकरण, कॉँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच स्वाभिमानीत पडलेली फूट व तालुक्यातील राजकारणात प्रस्थापितांकडून मराठा नेतृत्वावर होत असलेला अन्याय यातून शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडी उदयास आली.तालुक्यात मराठा समाजाचे मतदार प्रथम क्रमांकावर असतानाही कॉँग्रेस, राष्ट्रवादी या समाजाच्या उमेदवाराला डावलले. खासदार शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीमध्ये उल्हास पाटील चळवळीतील खंदा कार्यकर्ता व बहुजनांचा आरसा असतानाही खा. शेट्टींनी त्यांची उमेदवारी डावलल्याने पाटील शिवसेनेच्या आश्रयाला गेले, अन् बहुजन समाजाच्या उमेदवाराला संधी मिळाल्याने त्यातच चळवळीचा संयमी नेतृत्व अशी पाटील यांची ओळख असल्याने प्रत्येक गावांतून त्यांनी मताधिक्य घेतले. परिणामी नेहमी कॉँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी असणारे शहरात प्रथमच पाटील यांच्या रूपाने शिवसेनेच्या पाठीशी जाऊन कॉँग्रेसी विचाराची परंपरा मोडीत काढली.येथील राजकीय नेत्यांनी सोयीचे राजकारण केले असले, तरी बदलत्या राजकीय समीकरणातून भाविष्यातील राजकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीतून कॉँग्रेस नेतृत्वाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.गावात सुमारे चौदा हजार मतदारशिरोळ विधानसभा मतदारसंघात जयसिंगपूरनंतर कुरूंदवाड शहराचीच मतदारसंख्यानुसार वर्णी लागते. पंचवीस हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सुमारे चौदा हजार मतदार आहेत. मराठा, मुस्लीम, लिंगायत, जैन यांच्यासह बाराबलुतेदार समाज आहे. नगरपालिकेची स्थानिक निवडणूक वगळता येथील मतदार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नेहमी कॉँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशीच राहिले आहेत.