शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतोय खड्ड्यांवरच

By admin | Updated: November 11, 2014 00:05 IST

दिवसेंदिवस खड्ड्यात वाढच : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची अवस्था

राजाराम कांबळे -- मलकापूर -दरवर्षी रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधींचा खर्च करूनही या रस्त्यावरील खड्ड्यात मात्र दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाहनधारक व नागरिक यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनेक करांची आकारणी केली जाते; पण शासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या साठ्यालोठ्यातून जनतेकडून घेतलेल्या पैशांची कशी लूट केली जाते, याचे जिवंत उदाहरण कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिल्यास आपणाला दिसेल. कोकणातील रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, देवरुख, जयगड, गणपतीपुळे, आदी पर्यटनस्थळांना व माल वाहतुकीसाठी कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिले जाते. एवढेच नाही, तर गोव्याकडे पाचालमार्गे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. नाणीजसारख्या माध्यमिक शिक्षणाकडे याच मार्गावरून जाता येते. मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा समजला जातो. एवढ्या महत्त्वाच्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास महामंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष झालले दिसते; पण या रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावरील खड्ड्यांत वाढच होत आहे. जवळजवळ २०० वळणांचा व झाडा-झुडूपांनी वेढलेला हा निसर्गरम्य कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात जात असताना महामंडळ मात्र डोळे असून, आंधळ्याचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरील बांधकाम विभागाने लावलेले दिशादर्शक फलक, निवारा शेड गायब होत आहेत. तर रस्त्यावर काहींनी पक्की बांधकामे केली आहेत. मलकापूर ते आंबा दरम्यान नवीन केलेली साईडपट्टी खचली आहे. बांबवडे येथील पुलाचे काम रेंगाळलेले आहे. तर जुळेवाडी येथील मोरीचा पूल गायब आहे. अधिकाऱ्यांनी कागदावरच पूल बांधल्याचे दाखवून सुमारे ४० लाखांचा ढपला पाडला आहे. सदर अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.जनतेने कर रूपाने आपला पैसा सरकारी तिजोरीने जमा करावयाचा व शासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी साठेलोटे करीत तो लुटायचा, हेच चित्र पाहायला मिळते. मलकापूर-वारुळ येथील नदीवरील पुलाला सुमारे १३० वर्षे झाली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. नवीन पूल बांधण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.या मार्गावरून वारणा, विश्वास, उदय, दत्त, निनाई, आदी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू होणार आहे. याच मार्गावरून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, बॉक्साईट वाहतूक, परिवहनच्या एस. टी. बसेस, ट्रॅव्हल कंपन्यांच्या आराम बस यामुळे या रस्त्यावर चोवीस तास रहदारी जाम असते. अनेकवेळा अपघात हे केवळ खड्डा चुकविणे व वेड्यावाकड्या वळणांमुळे घडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. नवीन शासनाने यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.आंदोलनाचा इशारायेत्या पंधरा दिवसांत या मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा मलकापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू प्रभावळकर यांनी दिला आहे.कागदोपत्री खर्चशाहूवाडी तालुक्यातील भेरेवाडी ते जुळेवाडी खिंडीतील पुलाचे काम न करता येथील अधिकाऱ्यांनी सुमारे ४० लाख रुपये कागदोपत्री खर्च दाखविला आहे. येथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी सांगितले.