शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:43 AM

कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट ...

ठळक मुद्देमहापुरातील कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट; झूम प्रकल्पात फवारणीमहापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनकडून बायोसॅनिटेशनची प्रक्रिया

कोल्हापूर : महापुरामुळे शहरात निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी कमी करण्यासह या कचऱ्याची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्याचे काम महानगरपालिका, असोसिएशन आॅफ अर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूर यांच्याद्वारे गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे. त्यात बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी झूम प्रकल्पात येणाऱ्या नव्या कचऱ्यावर केली जात आहे.पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेला कचरा मोठ्या प्रमाणात झूम प्रकल्पामध्ये येत आहे. साधारणत: रोज एक टन कचरा या प्रकल्पामध्ये टाकण्यात येत आहे. त्यात कापसाच्या गाद्या, धान्य, कपडे, कागदी बॉक्स, फर्निचर, आदींचा समावेश आहे.

हा कचरा कुजणे सुरू झाले आहे. त्यातून लिंचेट बाहेर पडत असल्याने या कचऱ्यांच्या दुर्गंधीची तीव्रता अधिक आहे. ही दुर्गंधी कमी करणे तातडीने गरजेचे होते. फॉगिंग मशीन, अन्य रसायने यांच्या वापरावर मर्यादा होत्या; त्यामुळे या कचऱ्यांची पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका आणि असोसिएशन आॅफ आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्सने पाऊल टाकले आहे. बायोसॅनिटेशन आणि बायोकल्चर यांची फवारणी अग्निशमन दलाच्या चार टँकरद्वारे या कचऱ्यांवर केली जात आहे; त्यामुळे कचऱ्यांची दुर्गंधी कमी होण्यास मदत होत आहे.

कम्पोस्ट खतामध्ये रूपांतरबायोसॅनिटेशन आणि कल्चर यांच्या फवारणीमुळे महापुरातील कचऱ्याची दुर्गंधी साधारणत: ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. या फवारणीमुळे संंबंधित कचऱ्यातील विषारी वायू शोषले जाते आणि आॅक्सिजन हवेत सोडला जातो. या कचऱ्यांचे विघटन होऊन दोन महिन्यांत त्याचे कम्पोस्ट खत तयार होते. पर्यावरणपूरक पद्धतीने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

झूम प्रकल्पातील कचऱ्यावर गुरुवारपासून फवारणी करण्यात येत आहे. महापालिका, आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे काम सुरू आहे; त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मदत झाली असल्याचे असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी सांगितले.

महापुरामुळे निर्माण झालेला कचरा झूम प्रकल्प येण्याचे कमी होईपर्यंत संबंधित फवारणी केली जाणार आहे. त्यानंतर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेसाठी या प्रक्रियेचा उपयोग केला जाणार असल्याचे कोराणे यांनी सांगितले.

लिंचेट बाहेर पडून दुर्गंधीमहापुराच्या पाण्यातील सर्व कचरा भिजलेला आहे. शिवाय तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; त्यामुळे त्यातून लिंचेट बाहेर पडून दुर्गंधी सुटलेली आहे; त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. ते टाळण्यासाठी संबंधित फवारणी करण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर