शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना बसला विजेचा धक्का; तरुण अभियंत्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 18:06 IST

कोल्हापुरात णेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाला विजेचा धक्का बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

शिवाजी सावंत गारगोटी : गणेशोत्सवाचा स्वागत फलक लावताना फलकाचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून तरुण अभियंत्याचा जागेवरच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.अरूण रमेश वडर (वय २३, रा.शिवाजी नगर,गारगोटी)असे त्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी,अवघ्या आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने तरुण मंडळाचे स्वागत फलक उभारण्यासाठी तरुणांची लगबग सुरू झाली आहे. शुक्रवारी रात्रीच्या दहाच्या सुमारास येथील शिवाजी नगरातील अष्टविनायक तरुण मंडळाचे सदस्य बसस्थानक परिसरातील गारगोटी कोल्हापूर मार्गावरील पाटबंधारे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ स्वागत फलक लावत होते. त्यावेळी अनवधानाने या फलकाचा उच्चविद्युत प्रवाह असणाऱ्या तारेला स्पर्श झाला.

विजेचा प्रवाह सुरू असल्याने फलक धरलेल्यांना जोराचा धक्का बसला. यामध्ये अरूण रमेश वडर यांचा जागीच मृत्यू झाला तर श्रीधर वडर,अमोल सुतार,अविनाश भोपळे,सौरभ शालबिद्रे,विशाल वडर (सर्वजण रा.शिवाजीनगर,गारगोटी)हे पाचजण  धक्याने रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंतजनक आहे. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय गारगोटी येथे प्राथमिक उपचार करून सीपीआर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यत जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जून आबिटकर,शेखर देसाई रुग्णालयात उपस्थित होते.

नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अरूण याच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे. या परिस्थितीत त्यांने आपले इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केले होते. एकुलत्या एका तरुण मुलावर काळाने झडप घातल्याने वडर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडिल एकुलत्या एका मुलाचा आधार हरपल्याने धायमोकलून रडत आहेत. तर संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

गेल्या दोन दिवसापासुन तालुक्यातील सर्व गावांत गणेश उत्सव तरुण मंडळांचे उत्साही तरुण गणेशोत्सव फलक,स्वागत कमानी,मंडळांचे नेत्यांचे,पदाधिकारी यांचे डिजिटल फलक लावण्यासाठी चढाओढ करीत आहेत. रस्त्याच्या कडेला आणि जागा मिळेल तिथे विद्युत पुरवठा सूरू असलेल्या खांबाला टेकून डिजिटल फलक लावण्यात तरुणाई मग्न आहे. त्यांना याचे भान नसल्याने जिवावर बेतू शकते. पण या गोष्टीकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी आपल्या जीवाची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी असे फलक लावल्यास कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

डॉ. सुतार यांच्या प्रथमोपचाराने जीव वाचला... 

धक्का बसल्याने अविनाश भोपळे यांचे डोके रस्त्यावर आपटल्याने डोक्यास गंभीर इजा झाली होती. त्यांना कार्यकर्त्यांनी उचलून डॉ. सुतार यांच्या दवाखान्यात नेले. डॉ.सुतार यांनी तातडीने प्राथमिक उपचार केल्याने भोपळे यांचा जीव वाचला असल्याचे घटनास्थळावर बोलले जाते होते. "तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवाचे फलक लावताना विजेच्या खांबाचा अथवा विद्युत प्रवाह असलेल्या तारांपासून सुरक्षित अंतरावर फलक उभारावेत.स्वतःची आणि इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी," - प्रांताधिकारी हरेश सुळ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातGaneshotsavगणेशोत्सव